Wednesday , December 17 2025
Breaking News

भीमगड परिसरातील 754 कुटुंबे व 3059 गावकऱ्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर : मंत्री ईश्वर खंड्रे

Spread the love

 

तळेवाडी जंगलात वनमंत्र्यांची ग्रामस्थांशी बैठक
खानापूर : भीमगड वनपरिक्षेत्रातील गावांतील रहिवाशांना योग्य मोबदला देऊन त्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर केले जाईल, असे आश्वासन वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी दिले आहे.
सोमवारी रात्री मंत्री खांड्रे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तळेवाडीला भेट देऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी सरकार स्थलांतरित गावकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास तयार आहे तर गावकऱ्यांनी स्वेच्छेने स्थलांतर करण्यास सहमती दर्शविली.
यावेळी ईश्वर खंड्रे यांनी सांगितले की, भीमगड वनक्षेत्रात सध्या 754 कुटुंबे व 3059 लोक 13 वस्त्यांमध्ये राहतात, पूर्ण गावातील लोकांनी स्थलांतरित होण्यास सहमती दर्शवल्यास अशा गावांतील लोकांना पुनर्वसनाचा मोबदला देऊन स्थलांतराची कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली.
गावकऱ्यांना संबोधित करताना ईश्वर खंड्रे यांनी विस्थापितांना पुनर्वसनासाठी शासनाकडून दिलेली भरपाईच्या रकमेबाबत विशेष काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

समाज सारथी सेवा संघाची येळ्ळूरमध्ये स्थापना

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर मधील समान विचार आणि ध्येय असलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *