Monday , December 8 2025
Breaking News

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने रयत संघटनेतर्फे विधानसौधसमोर निदर्शने

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे सोमवारी (ता.१६) विधानसभेसमोर हे आंदोलन केले होते. सुमारे अर्धा तासाच्या चर्चा नंतर मुख्यमंत्र्यांनी चार दिवसात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे दिले होते. पण त्यांनी आश्वासन न पाळल्याने रयत संघटनेतर्फे पुन्हा विधानसभेसमोर निदर्शने करण्यात आली.
बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. याप्रसंगी कृषी खात्याचे मंत्री येऊन भेट देऊन मुख्यमंत्र्यांशी बैठक घडवून आणली होती. आर्धा तासाच्या बैठकी मध्ये चार दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या समस्या कळविण्याचे आश्वासन दिले होते. पण गुरुवारअखेर कोणतेही आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा बेळगांव येथे विधान सौद समोर काही वीज समस्या, ऊस, सोयाबीन दरासह शेतकऱ्याच्या विविध समस्यांबाबत निदर्शने व ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात विरोधात घोषणा देण्यात देऊन निषेध करण्यात आला. तात्काळ सरकारने शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेऊन त्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू पोवार यांनी दिला. यावेळी प्रकाश नाईक किसन नंदी, संजू हवनावर, इराण्णा पाटील, बाबासाहेब पाटील, सुरेश गाडीवडर, संजीव पाटील, सुरेश संपगावी, सर्जेराव हेगडे, बाबुराव पाटील, मयूर पोवार यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *