
बेळगाव : आषाढी वारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना एक अंत्यत दुर्दैवी घटना घडली. बेळगाव मधील शुभम पावले (वय 27) या भाविकाचा चंद्रभागा नदीत मृत्यू झाल्याचे समजते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगावमधील काही मित्र पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला गेले असता आज सकाळी सुमारे सातच्या सुमारास सर्व मित्र चंद्रभागा नदीत, पुंडलिक मंदिराजवळ आंघोळीसाठी गेला असता, पाण्याचा अंदाज न आल्याने चार जण वाहून गेल्याचे समजले. त्यापैकी तिघे सुदैवाने सुखरूप बाहेर पडले. पण शुभम हा वाहून गेला. प्रशासन व स्थानिक बचाव पथकाने केलेल्या चार तासांच्या शोधमोहीमेनंतर शुभमचा मृतदेह नदीतून बाहेर काढला.
Belgaum Varta Belgaum Varta