Saturday , July 27 2024
Breaking News

कर्नाटक

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संथगतीने

  मांगुर फाट्यावरून वाहतूक बंद; पोलिसासह महसूल विभाग घटनास्थळी निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात चार दिवसापासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी (ता.२६) सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने मांगुर फाट्यावर सेवा रस्त्यासह शेतीवाडीतील पाणी आल्याने दुचाकी स्वारांची तारांबळ उडाली. शिवाय महामार्गावरील वाहतूक मंद गतीने सुरू …

Read More »

राज्याच्या मुख्य सचिवपदी शालिनी रजनीश यांची नियुक्ती

  बेंगळुरू : राज्य सरकारचे मुख्य सचिव रजनीश गोयल 31 जुलै रोजी निवृत्त होत आहेत आणि शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या पत्नी शालिनी रजनीश यांची राज्य सरकारच्या पुढील मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री …

Read More »

जिल्हा पालकमंत्र्यांनी केली खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

  मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जनतेच्या तक्रारी स्वीकारून समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या बेळगाव : जिल्ह्यातील संभाव्य अतिवृष्टी/पुराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी (26 जुलै) खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त व पावसाने नुकसान झालेल्या भागांना भेट दिली. जांबोटी रोडवरील कुसमळी पूल, त्यानंतर खानापूर ते जांबोटीला जोडणाऱ्या मध्यभागी …

Read More »

जवाहर तलावातील गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल : पंकज गाडीवड्डर यांचे पत्रक

  निपाणी (वार्ता) : दमदार पडलेल्या पावसामुळे येथील शहरासह उपनाराला पाणीपुरवठा करणारा जवाहरलाल तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. दोन दिवसात तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी हा तलाव भरूनही शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे तलावातील गाळ काढला असता तर मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता. पण …

Read More »

धो धो पावसातच नेला “त्या” दुर्दैवी महिलेचा मृतदेह आणि केले अंत्यसंस्कार..

  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिरडीवरून चार किलोमीटर आणावे लागले होते. गेल्या शुक्रवारी दुपारी आमगांव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38) हिला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली. त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हर्षदा …

Read More »

सदलगा शहर परिसरातील दूधगंगा नदीच्या पूर परिस्थितीचा एनडीआरएफ टीमने घेतला आढावा

  चिकोडी : चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहराजवळून वाहत असणाऱ्या दूधगंगा नदीला मोठा पूर आला असून, सदलगा शहर परिसरातील शेतमाळ्यात पाणी शिरले आहे. किसान ब्रिज खालून देखील पाणी वाहत आहे. या दूधगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे नदीची पाणी पातळी तासातासाला वाढत आहे. त्यामुळे सदलगा शहरातील दाखल झालेल्या एनडीआरएफ टीमने …

Read More »

व्हटकर कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

  निपाण (वार्ता) : येथील जत्राट वेस मधील रहिवासी तिरुपती व्हटकर यांच्या अंगावर घराची भिंत कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या कुटुंबियांची परिस्थिती पूर्णतः हलाखीची आहे. त्यामुळे या कुटुंबाला शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. पाटील …

Read More »

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी नगदी पिकासह भाजीपाल्याची पिके घेत आहेत. त्यांना भाजीपाला आणि इतर पिकांच्या विक्रीसाठी बेळगाव आणि कोल्हापुर येथील बाजारपेठेला जावे लागते. पण यावेळी कोल्हापूरला जाताना कोगनोळी आणि बेळगावला जाताना हत्तरगी टोलनाक्यावर वाहनांना टोल घेतला जातो. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने …

Read More »

निःपक्षपातीपणे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी; खानापूर तालुका काँग्रेसची मागणी

  खानापूर : तालुक्यात यावर्षी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यात बऱ्याच घरांची पडझड होत आहे. पडझड झालेल्या घरांचे ताबडतोब पंचनामे करून तहसिलदार कार्यालयाकडे पाठवायचे आहेत. यासाठी पडझड झालेल्या घरांचे पंचनामे व्यवस्थित व्हावेत, पीडीओ व इंजिनियर यांनी लोकांना नाहक त्रास देऊ नये, स्वताच्या पगारातील पैसे द्यायचे असल्यासारखे जनतेशी वागू …

Read More »

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिरडीवरून चार किलोमीटर आणावे लागले होते. गेल्या शुक्रवारी दुपारी आमगाव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38) हिला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली. त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा …

Read More »