Monday , May 25 2026
Breaking News

कर्नाटक

फायटर्सने कोरले ‘अरिहंत’ चषकावर नाव

  राजमनी ट्रॅव्हल्स उपयोजिता; व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री बालवीर स्पोर्ट्स क्लबच्यावतीने आयोजित ‘अरिहंत चषक’ व्हॉलीबॉल लीग स्पर्धेच्या अंतिम सामना राजमनी ट्रॅव्हल्स व नितीन शिंदे फायटर्स या दोन संघांमध्ये झाला. यावेळी झालेल्या सामन्यात ३ विरुद्ध १ सेटने नितीन फायटर्स संघाने विजय संपादन करून अरिहंत चषकावर …

Read More »

अरिहंत साखर कारखान्यास अत्युत्तम तांत्रिक साखर कारखाना पुरस्कार प्रदान

  निपाणी (वार्ता) : जैनापूर येथील अरिहंत साखर कारखान्याने आपल्या उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीच्या जोरावर ‘अत्युत्तम तांत्रिक साखर कारखाना’ हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. राज्याच्या साखर उद्योगात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बेळगाव येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे साखर मंत्री शिवानंद पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. खाजगी साखर कारखान्यातील पुरस्कारासाठी अरिहंत …

Read More »

बेंगळुरू- बेळगाव- मुंबई नव्या रेल्वेगाडीला रेल्वेमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

  बेळगाव : बेंगळुरू ते मुंबईदरम्यान सुरू करण्यात आलेल्या नव्या रेल्वेसेवेला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा झेंडा दाखविला. या नव्या रेल्वेमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी सोय होणार असून बेळगावमार्गे धावणाऱ्या या गाडीमुळे दोन्ही राज्यांतील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी दक्षिण …

Read More »

आप्पाचीवाडी पुलाच्या कामासाठी २८ रोजी पाटबंधारे खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकणार

  निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, मतिवडे, सुळगाव आणि हदनाळ या गावांना जोडणाऱ्या कॅनॉलवरील पुलाचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा २० मे रोजी पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला होता. पण काही तांत्रिक अडचणीमुळे मोर्चावर टाळे ठोकण्याचा कार्यक्रम …

Read More »

सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रभाग १५ मधील नागरिकांचा पालिकेवर घागर मोर्चाचा इशारा

  निपाणी (वार्ता) : चार महिन्यांपासून प्रभाग क्रमांक १५ मधील पाणी समस्येबाबत नगरपालिकेला वेळोवेळी कळवले आहे. तरीही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना झालेली नाही. सध्या प्रभागात दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. येथे बुधवारपर्यंत पाणी समस्या निकाली काढावी अन्यथा नगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांनी दिला. …

Read More »

फेरमूल्यांकनानंतर झुंजवाड (के.एन.) येथील दिव्या देसाई 625 पैकी 625 गुणांसह कर्नाटकात संयुक्त अव्वल

  खानापूर : तालुक्यातील झुंजवाड (के.एन.) येथील कु. दिव्या प्रदीप देसाई हिने आपल्या चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर राज्यस्तरीय ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. फेरमूल्यांकनानंतर तिने 625 पैकी तब्बल 625 गुण मिळवत कर्नाटकात संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला. प्राथमिक निकालात दिव्याला 625 पैकी 624 गुण मिळाले होते. सर्व विषयांत शंभर पैकी …

Read More »

वाढत्या उन्हामुळे निपाणी बाजारपेठेत ताडपत्रीची वॉटरबॅग ठरतेय ‘नॅचरल फ्रीज’

  निपाणी (वार्ता) : रणरणत्या उन्हात घसा कोरडा पडल्यावर सामान्यतः फ्रिजच्या थंड पाण्याचा आधार घेतो. मात्र निपाणी बाजारपेठेत सध्या एका अशा ‘देसी फ्रीज’ची चर्चा आहे, जो अवघ्या १५० रुपयांत विजेविना पाणी माठासारखे गार ठेवतो. महिनाभरात सुमारे १०० हून अधिक वॉटरबॅग विक्री झाल्या आहेत. त्याच्या किमती आकारमानानुसार १५० ते ३०० रुपयापर्यंत …

Read More »

मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर थेट दरोडा

  इंधनदरवाढीवरून सिद्धरामय्या यांचा हल्लाबोल बंगळूर : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांची वाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या जगण्यावर अतिरिक्त आर्थिक ओझे टाकले असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत एक्स खात्यावर …

Read More »

तुंगभद्रा धरणाजवळ भीषण अपघात; ट्रॅक्टर पुलावरून कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

  बंगळूर : ट्रॅक्टरला मागून टँकर लॉरीने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची भीषण घटना शुक्रवारी विजयनगर आणि कोप्पळ जिल्ह्यांच्या सीमेवरील तुंगभद्रा धरणाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर घडली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसली तरी ते …

Read More »

निपाणी शहरातील गंभीर मूलभूत समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील मूलभूत समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून नागरिकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील खराब रस्ते, दूषित पाणीपुरवठा, वाढती लाचलुचपत आणि समस्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त झाले झाले आहे. याबाबत संबंधितांनी या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन या …

Read More »