खानापूर : खानापूर – यल्लापुर मार्गावरील बिडी नजीक झुंजवाड वळणावर धारवाडच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सोमवारी सायंकाळी घडली. अयुम अकबर नाईक (वय 26 वर्ष) कोट्टूर, तालुका-जिल्हा धारवाड असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत नंदगड पोलीस स्थानकात घटनेची नोंद …
Read More »महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांच्याकडून कुसमळी पुलाची पाहणी; लवकरच अवजड वाहतूक सुरू होणार
खानापूर : बेळगाव – चोर्ला मार्गावरील मलप्रभा नदीवर असलेल्या कुसमळी नजीकच्या पुलाची प्रत्यक्ष पाहणी कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी केली असून एका आठवड्यानंतर या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, खानापूरचे तहसीलदार दूंडाप्पा …
Read More »खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांना निवेदन सादर
खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांना विविध मागण्यांसंदर्भात प्रामुख्याने सरकारी जमिनी बळकावणे आणि कौलापूरवाडा येथील पोल्ट्री फार्म संदर्भात निवेदन देण्यात आले. कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा आज दि. 30 जून रोजी कुसमळी येथील पुलाची पाहणी करण्यासाठी आले असता खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन …
Read More »गर्लगुंजीत नेम्मदी केंद्र करा; महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांचा सकारात्मक प्रतिसाद
खानापूर : गर्लगुंजी, इदलहोंड, शिंगिनकोप, खेमेवाडी, गणेबैल, निटूर, प्रभुनगर, माळअंकले, झाडअंकले, बाचोळी, शिवाजीनगर आणि इतर गाव जांबोटी येथील नेम्मदी केंद्र येथे जोडण्यात आली आहेत. पण गर्लगुंजी आणि जांबोटीचे अंतर अंदाजे 25 ते 27 कि. मी. आहे. शेतकरी विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्येक लहान सहान सर्टिफिकेट, वारसा, इन्कम, डोमीसैल, इतर सर्वच …
Read More »खानापूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत खानापूर तालुका समितीच्या वतीने निवेदन सादर
खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत आणि मराठी नामफलकाबाबत तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, हेस्कॉम, आरोग्य विभाग आणि बस व्यवस्थापक यांना खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज दि. 30 जून रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, पावसामुळे तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून दैनंदिन वाहतूक …
Read More »वज्र धबधबा पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांचा आमटे क्रॉसजवळ अपघात : दुचाकी चालकाचा मृत्यू
खानापूर : तालुक्यातील परवाड गावाजवळचा वज्र धबधबा पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीने 407 मालवाहू वाहनाला समोरासमोर धडकल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आणि मागे बसलेला गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी बेळगाव-चोर्ला महामार्गावरील आमटे क्रॉसजवळ घडली. हुबळी तालुक्यातील रेवडीहाळ येथील रहिवासी दर्शन मौनेश चव्हाण (23), रविवारी त्याचा मित्र रघु कल्लप्पा …
Read More »मूर्तिकाराचे घर कोसळून 100 हून अधिक गणेश मूर्त्या ढिगाऱ्याखाली; आर्थिक मदतीचे आवाहन
खानापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मेरडा येथील गणेश मूर्तिकार तुकाराम परसराम सुतार यांचे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळी तुकाराम परशराम सुतार यांच्या घराची पडझड झाली असून तुकाराम सुतार हे शेडू पासून गणेश मूर्ती बनविण्याचे काम करीत असतात मात्र घर पडल्यामुळे त्यांनी तयार …
Read More »नेरसे बीटमध्ये हरीणाची शिकार; 9 जणांना अटक
खानापूर : लोंढा झोनच्या नेरसे बीटमध्ये गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता एका हरीणाची (सांबर)ची शिकार करण्यात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळताच त्या माहितीच्या आधारे, वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, नेरसे वन सर्वेक्षण क्रमांक 102 ला लागून असलेल्या मलकी सर्वेक्षण क्रमांक 104/2 मध्ये …
Read More »खानापूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत तालुका समितीच्या वतीने सोमवारी निवेदन देणार!
खानापूर : खानापूर तालुक्यातील रस्त्याची समस्या, वीज पुरवठा खंडित समस्या आणि सरकारी इस्पितळात मराठी फलक लावणे आदी समस्यांबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दि. 30 जुन रोजी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. ते शुक्रवारी खानापूर येथे झालेल्या खानापूर तालुका …
Read More »थार चालकाने घातली हालात्री नदी पुलावरील पाण्यातून गाडी!
खानापूर : खानापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे खानापूर-हेमाडगा-अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा नजीक असलेल्या हालात्री पुलावर पाणी आल्याने या भागातील वाहतूक बंद झाली आहे. परंतु काही अतिउत्साही वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून आपल्या गाड्या घालत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta