Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

ताराराणी हायस्कूलचे शिक्षक एस. एन. पाटील यांचे निधन

खानापूर (प्रतिनिधी) : निडगल (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व ताराराणी हायस्कूलचे सहशिक्षक एस. एन. पाटील (वय ५१) यांचे रविवारी दि. २० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

Read More »

खानापूरात पाऊस ओसरला, नदी पात्रातील पाणी घसरले

खानापूर (प्रतिनिधी) : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखणाऱ्या खानापूर तालुक्यात गेल्या पाच दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पावसाने थैमान घातल्याने तालुक्यातील नदी, नाले, तलाव दुथडी भरून वाहत होते.रविवारी सकाळपासुन खानापूरसह तालुक्यात ऊन पाऊस असा लपंडाव खेळ सुरू होता. त्यामु़ळे रविवारी दुपारपर्यंत पावसाची उघडीप होती. काही वेळ ऊन पडले होते.खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी …

Read More »

अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्यांना किटचे वाटप

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील खानापूर नगरपंचायतीच्या समुदाय भवनात खानापूर शहरासह तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका तसेच आशा कार्यकर्त्यांना आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते आरोग्य किटसचे वितरण शुक्रवारी दि. १८ रोजी करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.अंजली निंबाळकर होत्या. तर कार्यक्रमाला तालूका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रें, बाल कल्याण खात्याचे अधिकारी व इतर …

Read More »

पित्यासह दोन मुलींची गळफास घेऊन आत्महत्या

चिक्कोडी : पत्नीच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने पती आणि दोन तरुण मुलींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टीमध्ये घडली आहे. या संबंधी मिळालेली माहिती अशी कि, बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टी गावातील चन्नव्वा रंगापुरे (वय ४०) या महिलेचे गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.  हा धक्का …

Read More »

बेकवाड ग्राम पंचायतने घेतली ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड ग्राम पंचायतने वरील तक्रारीची दखल घेऊन ग्राम पंचायतमध्ये ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लपा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पंच कमिटी पंचायत मेंबर व ग्रामस्थांची मिटिंग घेण्यात आलीया मिटिंगमध्ये आता पावसात साचलेले पाणी पाहून त्वरित उपाय योजना तयार करून पाणी काढण्याचे आदेश खानापूर तालुका पंचायत अधिकारी प्रकाश हल्लान्नावर यांनी पंचायत …

Read More »

मत्तीवडे येथील युवक अडकला सिदनाळ बंधाऱ्यातील पाण्यात

बंधाऱ्यावर बघ्याची गर्दी : अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव निपाणी (संजय सूर्यवंशी) : चार ते पाच दिवसाच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अनेकाचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. निपाणी तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. निपाणी तालुक्यातील वेदगंगा नदीवरील अकोळ सिदनाळ बंधारा मागील दोन दिवसापूर्वीच संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही गावचा …

Read More »

खानापूरात संततधार पाऊस, मलप्रभा नदी पात्रा बाहेर

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात पाचव्या दिवशीही सतत मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी पात्रा बाहेर वाहत आहे. पाण्याची पातळी वाढली आहे. सध्या परिस्थितीत मलप्रभा नदीचे पात्र धोक्यात असुन नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता भासत आहे.गेल्या काही दिवसापासून संततधार पावसाने तालुक्यात पाणीच पाणी करून सोडले आहे.गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद कणकुंबी …

Read More »

महाराष्ट्राकडून कर्नाटकाला चार टीएमसी पाणी देण्याचा निर्णय

बेंगळुरू : दरवर्षी उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून कर्नाटकाला चार टीएमसी पाणी देण्याचा महत्वाचा निर्णय शनिवारी बंगळूर येथील बैठकीत झाला. पाणीवाटप, पूरनियंत्रण व जलाशयांमधील पाण्याचा विसर्ग या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बी एस येडियुराप्पा व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. उन्हाळ्यात कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती …

Read More »

अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलची कर्नाटकने सुचना स्वीकारली; मंत्री जयंत पाटीलांची माहिती

बेंगळुरू : पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राज्याचे पाण्याची आवक-जावक, पाणीसाठा याबाबतची अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलसाठी आधुनिक रियल टाईम डाटा यंत्रणा बसवावी, अशी सूचना महराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बंगळूरमध्ये झालेल्या बैठकीत केली. ती त्यांनी मान्य केल्याची माहिती मंत्री पाटील यांनी तातडीने सोशल मिडियावर जाहिर केली आहे. संभाव्य पूरस्थितीवरील उपाययोजनांबाबत …

Read More »

ऐन पावसाळ्यात विद्यानगरात रस्ता, डुक्कराची समस्या

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या खानापूरात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरातील रस्त्याची समस्या तसेच डुक्कराची समस्या येथील रहिवाशांना सतावत आहे.मात्र खानापूर नगरपंचायत तसेच नगरसेवक झोपेचे सोंग घेऊन दिवस काढत आहेत.कोणी म्हटले आहे की, झोपलेल्या जागे करता येईल, मात्र झोपचे सोंग घेतलेल्या नगरपंचायतीला जागे करणे महा कठीण झाले आहे. …

Read More »