Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणी

आठवडाभरात मिळणार दोन महिन्याचे वेतन

  उत्तम पाटील यांची अधिकाऱ्यांशी चर्चा; कर्मचाऱ्यांचा संप मागे निपाणी (वार्ता) : शहरात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या पाणीपुरवठा तू भागातील ५० कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यांपासून थकीत आहे. याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही वेतन न मिळाल्याने सोमवारी (ता.२९) कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. परिणामी दिवसभर पाणीपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे सहकाररत्न उत्तम पाटील यांनी प्रांताधिकारी …

Read More »

समाजात राहूनही देश सेवा करणे शक्य

  उपनिरीक्षिका उमादेवी; मॉडर्न मध्ये कारगिल दिन निपाणी (वार्ता) : भारत देश विविध परंपरा आणि संस्कृतीने नटलेला स्वर्ग आहे. सर्व भारतीय एक असून देशाचे नागरिक आहोत. याचा गर्व असला पाहिजे. प्रत्येकांनी सर्व जाती-धर्म आणि भाषेचा आदर करावा. देशसेवा करायची असेल तर फक्त पोलीस अधिकारी किंवा सैन्य अधिकारी होऊन सीमारेषेवर लढायची …

Read More »

थकित वेतन दिल्याशिवाय पाणी नाही

  पाणीपुरवठा विभागाच्या कंत्राटी कामगारांचा इशारा; सोमवारपासून पाणी बंद निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या २४ तास पाणी योजनेचे कंत्राट जैन इरिगेशन यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे एकूण ४० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. पण चार महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. दोन वेळा निवेदन घेऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (ता.२९) काम बंद …

Read More »

पूरग्रस्तांनी घाबरून जाऊ नये : प्रियंका जारकीहोळी

  पूरग्रस्त गावांना दिल्या भेटी निपाणी (वार्ता) : आठवडाभर पडणाऱ्याया पावसामुळे निपाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी निपाणी मतदारसंघातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन प्रशासनाने सर्वतोपरी यंत्रणा साजरी केली असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन खासदार प्रियांका जायकीहोळी यांनी केले. निपाणी मतदारसंघातील …

Read More »

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी देशव्यापी आंदोलन

  राजू पोवार; पुणे येथे निर्धार मेळावा निपाणी (वार्ता) : देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. पण शेतीमालाला योग्य भाव देण्यास देशातील सरकार असमर्थ ठरले आहे. या उलट खते, बी- बियाण्याचे दर वाढविले आहेत. भाजीपाल्यालाही योग्य दर दिला जात नाही. अतिवृष्टी, महापूर काळात केवळ सर्वे करून शेतकऱ्यांच्या …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण व युवा समिती निपाणी यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

  निपाणी : तालुका महाराष्ट्र एकीकरण व युवा समिती निपाणी यांच्या वतीने निपाणीतील ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कुर्ली व सौंदलगा येथे उच्च प्राथमिक मराठी शाळांमध्ये वाटप केले. मराठी शाळा व भाषा वाचविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी …

Read More »

राष्ट्रीय महामार्गावरील दुहेरी वाहतूक सुरु; यमगर्णी येथे जोडला रस्ता

  निपाणी (वार्ता) : सलग चार दिवस होणाऱ्या पावसामुळे पुणे- बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील मांगुर फाट्याजवळ सेवा रस्ता आणि शेतीवाडीतील पाणी आल्याने विस्कळीत झाली होती. तर शुक्रवारी (ता.२६) एकेरी वाहतूक सुरू होती. शनिवारी (ता.२७) पहाटेपासूनच पाऊस थांबण्यासह पाणी वाहून गेले. तसेच यमगर्णी येथे महामार्ग रस्ता जोडल्याने दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. …

Read More »

निपाणीचा जवाहर तलाव ओव्हर फ्लो

  नगरपालिकेने सोडला सुटकेचा निःश्वास निपाणी (वार्ता) : निपाणीची जीवनदायिनी असणारा जवाहर तलाव आठवडाभराच्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला. यंदा सुरुवातीपासूनच शहर आणि परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे तलाव भरून पाणी तलावाबाहेर पश्चिमेकडील बाजूने बाहेर पडले. त्यामुळे वर्षभराचा पाणी प्रश्न निकालात निघाला असून नगरपालिका प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आता …

Read More »

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संथगतीने

  मांगुर फाट्यावरून वाहतूक बंद; पोलिसासह महसूल विभाग घटनास्थळी निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात चार दिवसापासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी (ता.२६) सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने मांगुर फाट्यावर सेवा रस्त्यासह शेतीवाडीतील पाणी आल्याने दुचाकी स्वारांची तारांबळ उडाली. शिवाय महामार्गावरील वाहतूक मंद गतीने सुरू …

Read More »

जवाहर तलावातील गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल : पंकज गाडीवड्डर यांचे पत्रक

  निपाणी (वार्ता) : दमदार पडलेल्या पावसामुळे येथील शहरासह उपनाराला पाणीपुरवठा करणारा जवाहरलाल तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. दोन दिवसात तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी हा तलाव भरूनही शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे तलावातील गाळ काढला असता तर मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता. पण …

Read More »