Monday , December 8 2025
Breaking News

बेळगाव

लसीकरणात बेळगाव देशात द्वितीय!

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल 17 सप्टेंबर रोजी राबविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक मेगा लसीकरण अभियानात बेळगाव जिल्ह्याने संपूर्ण देशात दुसरा क्रमांक पटकावून अत्युत्तम कामगिरी बजावली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. सदर मेगा लसीकरण अभियानामध्ये बृहन बेंगलोर महानगरपालिकेने 4,09,977 जणांचे लसीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला …

Read More »

सीमाभागातील मराठी भाषिकांकरिता शिनोळी येथील विद्यालयात प्रवेश सुरू

कोल्हापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांकरिता अपारंपारीक स्वरुपाचे शिक्षण देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभाग, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि लोकविकास केंद्र यांच्या अंतर्गत कौशल्य व उद्योजकता प्रमाणपत्र पत्र अभ्यासक्रम केंद्र शिनोळी येथील वसंत विद्यालय येथे सुरु झाले असून अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नावनोंदणी करावी असे आवाहन शिवाजी विद्यापीठाने केले आहे. …

Read More »

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात विविध विकासकामांचा शुभारंभ

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघात बुधवारी विविध विकासकामांना चालना देण्यात आली. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर बेंगळुरूमध्ये विधानसभा अधिवेशनात सहभागी झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधीनी विकासकामांचा शुभारंभ केला. मतदारसंघातील कुद्रेमानी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 11 लाख रुपये निधीतून नूतन इमारत बांधकामाचे भूमीपूजन स्थानिक लोकप्रतिनिधी व युवा काँग्रेस नेते मृणाल …

Read More »

महिला व मुलींना संरक्षण द्या : जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

बेळगाव : महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कडक शासन करण्याबरोबरच बेळगाव शहर परिसरात विविध गुन्ह्यांसह महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्यामुळे प्रशासनाने प्रामुख्याने महिला व मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचार विरोधी समितीने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचार विरोधी समितीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष नियाज …

Read More »

बेकवाड येथे सजावटीच्या माध्यमातून साकारली पंढरीची वारी

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रायोगौडा कुटुंबीयांनी पंढरीच्या वारीतील डेकोरेशनचा सोहळा साकारला आहे. त्यामध्ये रथात आळंदीहून पंढरपूरकडे येणारी पालखी, वरकरींचे रिंगण, वारकऱ्यांकडून होणारा विठ्ठलाचा जयघोष,   वारकऱ्यांकडून खेळली जाणारी फुगडी, विविध उपक्रम यात साकारलेले आहेत. प्लास्टिक बाहुल्या च्या माध्यमातून वारकऱ्यांच्या मूर्ती साकारल्या आहेत. महिला वारकऱ्यांना साड्या,  पुरुषांना …

Read More »

‘श्री’ विसर्जन शक्यतो लवकर करा : महामंडळाचे आवाहन

बेळगाव : राज्यभरात अद्यापही नाईट कर्फ्यू जारी असल्यामुळे शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारी श्रीगणेश विसर्जना दिवशी रात्री 9 च्या आत शक्यतो दिवसभरात सायंकाळपर्यंत महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केलेल्या आपापल्या भागातील नजीकच्या तलाव अथवा विहिरीच्या ठिकाणी श्री मूर्तींचे शांततेत विसर्जन करून सहकार्य करावे, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळाने केले आहे. …

Read More »

मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये देखील आता ‘क्यू आर कोड’

बेंगळुरू : कर्नाटक शिक्षण खात्याने कन्नड व इंग्रजी माध्यमांप्रमाणे आता मराठी माध्यमांच्या आठवी ते दहावी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये प्रत्येक पाठावर ‘क्यू आर कोड’ उपलब्ध करून दिला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रत्येक पाठाचा अभ्यास करताना संबंधित पाठाचा व्हिडिओ पाहता येणार आहे. कर्नाटक शिक्षण खात्याने यापूर्वी कन्नड व इंग्रजी माध्यमांमध्ये क्यू आर कोडचा …

Read More »

बेळगावात पाणी पुरवठा कर्मचार्‍यांचा संप मागे

बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आणि कर्नाटक नागरी पाणी पुरवठा मंडळाच्या संपकरी कामगारांनी शुक्रवारी आपला संप मागे घेतला. आ. अनिल बेनके यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. बेळगाव महानगरपालिका आणि कर्नाटक नागरी पाणी पुरवठा मंडळाच्या कामगारांना गेल्या 15 दिवसांपासून सणासुदीच्या काळातही वेतन मिळालेले नाही. ते तातडीने द्यावे तसेच पालिकेतर्फे वेतन अदा …

Read More »

देशात लसीकरणाचा विक्रम; बेळगावात उत्तम प्रतिसाद

दिवसभरात दिले दोन कोटी डोस नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचे संकट अद्यापही आहे. सध्या परिस्थिती हाताबाहेर नसली तरीही कोरोनाचं संकट केंव्हाही रौद्ररुप धारण करु शकतं. या संकटाशी दोन हात करण्यासाठी सध्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. गेल्या 16 जानेवारीपासून लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या या कार्यक्रमाअंतर्गत 77 कोटी …

Read More »

वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर आ. अंजली निंबाळकरांनी उठवला आवाज!

बेळगाव : कोरोना संकटाच्या काळातही नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले आकारल्याच्या मुद्द्यावर खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला. वाढीव वीजबिलांच्या शॉकने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले. विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी, गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात चर्चेवेळी खानापूरच्या आ. अंजली निंबाळकर यांनी वाढीव वीजबिलांच्या …

Read More »