Wednesday , April 2 2025
Breaking News

आजरा

शहीद प्रशांत जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहिद जवानाच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम, विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी लडाखमध्ये सैन्याच्या वाहनाला एक भीषण अपघात झाला. सैन्याला घेऊन जाणारा हा ट्रक थेट नदीत कोसळा. त्यात एकूण 7 जवान शहीद झाले होते.या अपघातात साताराचे विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव शहीद झाले. तुतर्क सेक्टरमध्ये अपघातात …

Read More »

गोव्याला फिरायला जाताय, सावधान!

चंदगडच्या तरूणांना गोव्यात ब्लॅकमेल करून लुटले, संरक्षणासाठी चंदगड पोलिसाकडे धाव तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गोव्याला फिरायला गेलेल्या चंदगड तालुक्यातील ११ तरुणांना एका खोलीत कोंडून त्यांचा व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २६) गोव्यात घडली असून या घटनेनंतर पीडित तरुण गेले …

Read More »

गडहिंग्लजमधील जवानाचे जम्मू-काश्मीरमध्ये अपघाती निधन

हलकर्णी : जम्मू-काश्मीरमधील ग्लेशियर-सियाचीन भागात २२ मराठा जवानांच्या बसला अपघात झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक येथील जवानाचा मृत्यू झाला. प्रशांत शिवाजी जाधव (वय २७) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच तालुक्यात शोककळा पसरली आहे. शनिवारी (दि. २८) खास विमानाने त्यांचे पार्थिव बेळगाव येत आणण्यात …

Read More »

आजर्‍याजवळील रामतीर्थ पर्यटनस्थळाजवळ सापडली मानवी कवटी

आजरा : आजर्‍याजवळील रामतीर्थ पर्यटनस्थळाच्या वळणावर मानवी कवटी सापडली आहे. विजेच्या डांबाच्याखाली असणारी कवटी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी या कवटीचा पंचनामा करून ताब्यात घेतली आहे. सुलगाव येथील तानाजी डोंगरे गावी जात असताना त्यांना विजेच्या खांबाच्याखाली मानवी कवटी असल्याचे लक्षात आले. दरम्यान रामतीर्थ पर्यटन स्थळाकडे ये-जा करणार्‍या नागरिकांनी …

Read More »

देशात महागाईची चर्चा नाही तर भोंगे कोठे लावायची याचीच जास्त चर्चा : जलसंपदामंत्री जयंत पाटील

नेसरी येथे राष्ट्रवादीचा चंदगड मतदारसंघ संवाद मेळावा संपन्न तेऊरवाडी (एस. के. पाटील) : देशात महागाईचा कळस झाला आहे. जेथे महागाई विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे तेथे भोंगे कोठे लावायचे आणि कोठले काढायचे याचीच जास्त चर्चा होत आहे. या सर्वाना मूठमाती द्यायची असेल तर राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून कोल्हापूरच्या दोन …

Read More »

महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशिलकर यांच्या जीवनावारील ’रग तांबड्या मातीची… झुंज वाघाची!’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

तेऊरवाडी : महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मल्ल विष्णू जोशीलकर यांच्या जीवनावर आधारित ‘रग तांबड्या मातीची… झुंज वाघाची!’ या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. 17 रोजी आयोजित केला आहे. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे दुपारी साडेचार वाजता हा समारंभ होणार आहे. पत्रकार पी. ए. पाटील आणि सदानंद …

Read More »

१८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाचे आयोजन

  कृतज्ञता पर्वातील विविध कार्यक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा कोल्हापूर (जिमाका) : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने शासन आणि लोकांच्या वतीने लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करून राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी ६ मे २०२२ रोजी लोकराजाला …

Read More »

धावड काम करता करता मुलाचा शाळेचा अभ्यास घेणारी पाटणे फाट्यावरील माता; बापूसाहेब शिरगावकरानी दिला मदतीचा हात

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : आज दुपारी पाटणे फाट्यावरुन घरी येत असताना कृष्णा ऑईल मिलच्या समोर पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे धावड काम करणार्‍या झोपडीकडे बापूसाहेब शिरगावकर, जिल्हाध्यक्ष – अखिल भारतीय मानवाधिकार संघटन यांचे अचानक लक्ष गेले. समोरील दृष्य पाहून त्यांचा गाडीचे ब्रेक आपोआप दाबले गेले. समोर दृष्य होते ते …

Read More »

हुंदळेवाडीत उभारली आगळी वेगळी गुढी, गुढी पुस्तकांची गुढी विचारांची

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गुढी पुस्तकांची गुढी विचारांची या संकल्पनेअंतर्गत आज प्रा. रविंद्र पाटील हुंदळेवाडी (ता. चंदगड) यांच्या घरी आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. यावेळी पुस्तकांची गुढी उभा करून वाचन संस्कृती, वाचनाचे महत्त्व, व्हाट्स अ‍ॅप व इंटरनेटच्या विळख्यात अडकलेली तरुणाई, तरूणांमध्ये मोबाईलमुळे निर्माण झालेले एकटेपण, दिवसेंदिवस …

Read More »

मुगळी येथे नवीन रस्ता खचला; पडले भले मोठे खड्डे निकृष्ट दर्जाचे काम; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मुगळी (ता. चंदगड) येथे दोन ते तिन दिवसापूर्वी दलितवस्तीमध्ये केलेला नवीन डांबरी रस्ता खचला आहे. त्यामुळे या निकृष्ट कामाला जबाबदार कंत्रादारांकडून हे काम अर्धवट झाले असून त्यावर ग्रामपंचायतीने योग्य ती कारवाई करून रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा …

Read More »