मुंबई : काँग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आज त्यांची नियुक्ती झाल्याचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज नाना पटोले यांच्याकडील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »राजन साळवींच्या हाती धनुष्यबाण, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार राजन साळवी यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. काल साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाची राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर लगेचच त्यांनी पक्षप्रवेशासाठी ठाणे गाठले. आज ठाण्याला पोहोचून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पक्षप्रवेशापूर्वी एकनाथ शिंदे, राजन …
Read More »कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान : दवाखान्यावर छापा; डॉक्टर महिलेसह तिघांना अटक
कोल्हापूर : कोल्हापुरातल्या कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटल मधील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पर्दाफाश केला आहे. तसेच गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन महिलांनाही वरणगे पाडळी येथून अटक केली असून संशयितांकडून गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. गर्भलिंग निदान …
Read More »शिक्षण क्षेत्रावर चहूबाजूंनी हल्ले व्यापक चळवळीची नितांत गरज : प्रा. आनंद मेणसे
गडहिंग्लज : शिक्षण क्षेत्रावर चहू बाजूने हल्ले होत असून आपण जर असेच गप्प राहिलो तर नजीकच्या काळात शिक्षण घेणे ही केवळ श्रीमंत लोकांसाठी राखीव गोष्ट राहील आणि समाजातील आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थी शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहतील अशी भीती प्रा. आनंद मेणसे यांनी बोलताना व्यक्त केली. ते गडिंग्लज येथील शारदा …
Read More »ग्रामीण साहित्याचा ‘भीष्म’ काळाच्या पडद्याआड, ‘पाचोळा’कार रा. रं. बोराडे यांचे निधन
छ. संभाजी नगर : मराठी ग्रामीण साहित्यात विपूल लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांचे मंगळवारी वयाच्या ८४ वर्षीय निधन झाले. त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पाचोळा या कादंबरीमुळे त्यांना ‘पाचोळा’कार म्हणून ओळख मिळाली होती. ५५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली पाचोळा ही …
Read More »जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या!
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज प्रसिद्ध शिव व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिरीष महाराज मोरे यांच्या निधनामुळे तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या घटनास्थळी देहूरोड पोलीस …
Read More »तिलारी घाट दुरुस्तीच्या कारणास्तव पंधरा दिवस वाहतुसाठी बंद
चंदगड : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिलारी घाटाच्या दुरुस्तीला अखेर बांधकाम विभागाला मुहूर्त मिळाला आहे. घाटातील एका वळणावर अपघातप्रवण क्षेत्र असून तिथली दुरुस्ती गरजेची असल्याच्या मुद्यावर एसटी महामंडळाचा वाहतूक विभाग ठाम राहिल्याने बांधकाम विभागाने आजपासून कामाला सुरुवात केली आहे. अपघातप्रवण जागेवर गॅबियन भिंत उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे पंधरा …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून महाराष्ट्रात परतले!
छत्रपती शिवरायांबाबत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांचे वादग्रस्त वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मराठमोळ्या अभिनेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘आग्रातून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता. तर छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परत आले होते.’, असा खळबळजनक दावा अभिनेते राहुल …
Read More »साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या!
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धा स्थान असलेली शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहाटे कामावर जात असताना ही घटना घडली. शिर्डीत आणखी एका तिसऱ्या तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला झालाय. तो सुद्धा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. …
Read More »महाराष्ट्र केसरीची गदा पृथ्वीराज मोहोलने पटकावली; अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने मैदान सोडले
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळ आणि वादाची किनार लाभली. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत वाद झाला. कुस्तीपटू शिवराज राक्षे पराभव झाल्याचं घोषित केल्याने भडकला. त्यानंतर त्याने पंचांन लाथ मारल्याचं सांगितलं जातं आहे. पाठ टेकली नसल्याचं सांगत शिवराज राक्षेने वाद घातला. पण पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केलं. अंतिम फेरीत पृथ्वीराज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta