Sunday , September 20 2026
Breaking News

महाराष्ट्र

डॅडी अखेर तुरुंगाबाहेर! नगरसेवक हत्या प्रकरणी अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

  मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप प्रलंबित आहे. वय आणि अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून गवळीला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती …

Read More »

मनोज जरांगेंच्या मोर्चाचा दुसरा दिवस, मराठा मोर्चा आज मुंबईत धडकणार!

  जुन्नर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मोर्चा घेऊन मुंबईला निघाले आहेत. ते मुंबईतीली आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगेंचा मोर्चा आता जुन्नरमध्ये दाखल झाला आहे. किल्ले शिवनेरीच्या …

Read More »

29 तारखेला आरक्षणाचा तुकडाच पाडणार; मनोज जरांगे कडाडले

    मुंबई : येत्या 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील आपल्या लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या आझाद मैदानात येणार आहेत. दरम्यान, जरांगे यांच्या या आंदोलनाची पुन्हा एकदा महाराष्ट्रभर चर्चा चालू झाली आहे. एकीकडे गणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईत येणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्या व्यक्त …

Read More »

मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वीच सरकारचा मोठा निर्णय

  मुंबई : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्यासाठी आता त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात पुन्हा एकदा मराठा बांधव एकत्र येणार आहेत. 29 ऑगस्टपासून मराठा बांधवांच्या आंदोलनाला आझाद मैदानावर सुरुवात होणार आहे, त्यापूर्वीच 28 ऑगस्टला लाखो मराठा …

Read More »

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस गळती, 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू, दोन जखमी

  पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कंपनीत गॅस गळती झाल्याने चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर दोन जण बेशुद्ध आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडली फार्मासिटीकल कंपनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे, तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नंबर एफ 13 मध्ये …

Read More »

२५ ऑगस्ट रोजी प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ७० वी पुण्यतिथी महोत्सव…

  कोल्हापूर : दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती, समाधीसम्राट प.पू. १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ७० वी पुण्यतिथी महोत्सव जमखंडी जि. बागलकोट येथे २५ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे. विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती समाधिसम्राट प.पू. …

Read More »

विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

  मुंबई : जळगावमधील एरंडोल तालुक्यातील खेडी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खेडी गावाजवळील एका शेतात या पाचही जणांचे मृतदेह आढळले आहेत. शेताकडे जात असताना विजेचा धक्का लागल्याने या सर्वांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली …

Read More »

पूर परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा; गरज नसल्यास घराबाहेर पडू नका : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे जिल्हावासियांना आवाहन

  पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी कोल्हापूर (जिमाका): जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तथापि पूर परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर …

Read More »

तब्बल २१ वर्षांनी मुलगा झाला; बाळाला पाळण्यात ठेवून कृष्णेच्या पात्रात प्रवास करत दाम्पत्याने फेडले नवस!!

  सांगली : सांगलीत आज नवस फेडण्याची शेकडो वर्षांची अनोखी प्रथा आज सांगलीकराना पाहायला मिळाली. लग्नाच्या तब्बल २१ वर्षानंतर नवसाने एका दाम्पत्याला मुलगा झाला. याच नवस फेडण्यासाठी कृष्णा नदीतील पुराच्या पाण्यात लाकडी पाळण्यामध्ये बाळाला ठेऊन स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास करत हा दाम्पत्याने नवस फेडले. कोयना धरणातून सोडण्यात …

Read More »

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शाही उद्घाटन समारंभ कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »