Sunday , December 7 2025
Breaking News

शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू; चिक्कोडी तालुक्यातील दुर्दैवी घटना

Spread the love

 

चिक्कोडी : शाळेला सुट्टी असल्याने शेतात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली.

इंगळी गावातील पृथ्वीराज केराबा (१३), अथर्व सौंदलगे (१५) आणि समर्थ गडकरी (१३) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तिघेही सायकली घेऊन गावाबाहेरील शेततळ्यात पोहायला शिकण्यासाठी गेले. तिघांनाही पोहता येत नव्हते अशी माहिती आहे. शेताचा मालक नेहमीप्रमाणे फिरत असताना, त्याला खड्ड्याजवळ एक सायकल दिसली. जेव्हा त्याने खड्ड्यात डोकावले तेव्हा तिन्ही मुलांचे मृतदेह आढळले. याप्रकरणी अंकली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

सदलग्यात स्वा. सावरकर यांच्यावर डॉ. अमर अडके, डॉ. ज्योती चिंचणीकर यांचे व्याख्यान संपन्न

Spread the love  सदलगा : येथील अतुल जोशी यांच्या हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *