Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

खानापूरात पावसाचे थैमान सुरुच

तालुक्यात सर्व नद्या, नाले ओव्हरफ्लो; धोक्याचा संभव खानापूर (प्रतिनिधी) : मागील वर्षाप्रमाणे यंदाही खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. गुरूवारी पावसाचे प्रमाण अधिक वाढले त्यामुळे तालुक्यातील नद्यांची पाण्याची पातळी वाढली. तसे मलप्रभा नदीवरील जुना पूलावरून पाणी वाहत आहेत. त्यामुळे रामनगर, हल्याळ मार्ग पूर्ण पणे बंद झाला.त्याचप्रमाणे …

Read More »

पावसाचा जोर कायम; पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद

निपाणी : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर (NH4) सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. सद्यस्थितीत महामार्गावरून ५ ते ६ फूट पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक …

Read More »

जम्मू-काश्मीर: बारामुल्लात चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बारामूला जिल्ह्यातील सोपोरच्या वारपोरा गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तयब्याचे अतिरेकी होते. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली. मरणाऱ्यामध्ये एका टॉप कमांडरचा समावेश आहे. सुरक्षा बलांना घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा सापडला आहे. तसेच अनेक आक्षेपार्ह वस्तू …

Read More »

गणेश मूर्ती; विक्री केंद्राचे आमदार अनिल बेनके यांच्याकडून उद्घाटन

बेळगाव : शाहुनगर पहिला बसस्टॉप येथील आदित्य पाटील गणेश मूर्ती विक्री केंद्रातील प्लास्टर व शाडू मातीने बनविलेल्या पेण आणि कोल्हापूर येथील गणपती मूर्तीच्या विक्री केंद्राचे मंगळवारी सायंकाळी 7 वाजता बेळगाव शहराचे आमदार अनिल बेनके, भाजपा युवा नेते गजानन मिसाळे, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव …

Read More »

निट्टूर -घुल्लेवाडी ओढ्यातून तळगुळीचे ३ जण वाहून गेले; दोघांना वाचवण्यात यश

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालूक्यातीलकार्वे या गावावरून घुल्लेवाडी मार्गे कोवाड तळगुळीकडे जात असताना घुल्लेवाडी व निट्टूर दरम्यानच्या ओढ्याला आलेला पूर ओलांडतांना तिघेजण वाहून गेल्याची घटना आज (गुरुवार दि. २२ जुलै रोजी) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यातील दोघे जण वाचले आहेत तर एक महिला मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर …

Read More »

हालत्री नदीचा पूल पाण्याखाली

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खानापूर शिरोली मार्गावरील हालत्री नदीवरील पूल गुरूवारी मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे शिरोली हेमाडगापर्यंत अनेक गावाचा संपर्क खानापूर शहराशी तुटला आहे.

Read More »

नागरदळे येथील एअर फोर्सचा जवान कडेलगेच्या ओढ्यातून वाहून गेला

चंदगड तालूक्यात हळहळ तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कडलगे -ढोलगरवाडी (ता. चंदगड) या दोन्ही गावालगत असणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुरातून नागरळे येथील अभिषेक संभाजी पाटील (वय 26) हा युवक दुचाकीसह वाहून गेला. तर याच दुचाकीवरून प्रवास करणारा शशिकांत संभाजी पाटील हा युवक सुदैवाने बचावला.अभिषेक हा आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्यढोलगरवाडीला गेला होता. …

Read More »

मुसळधार पावसामुळे कानूर बुद्रुक येथे घरांचे नुकसान…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील कानूर बु. येथे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडपडी आणि घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बुधवारी (दि.२१ जुलै २०२१ रोजी) सकाळी ९ वाजता कृष्णा गोविंद गावडे यांच्या घरावर झाड पडून ४० हजारचे नुकसान झाले आहे. तर दुपारी १ वाजता धोडीबा शिवराम गावडे यांच्या …

Read More »

शाश्वत शेतीचा आधार, सर्जा राजाची जोडी दमदार

महाराष्ट्रीय बेंदूरानिमित्त सर्जा -राजाची पूजा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शेतकरी बंधूंच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा राजाचे उपकार स्मरण्याचा, त्यांना कृतज्ञतेची आरती ओवाळण्याचा कृषी संस्कृतीमधील महत्वाचा दिवस म्हणजे बेंदूर सण. आज महाराष्ट्रात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.आषाढ शुद्ध त्रयोदशीला हा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध …

Read More »

खानापूरासह तालुक्यात धुवाधार पाऊस; कुणकुंबीत १६८ मि.मी. पावसाची नोंद

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यात दुसऱ्यांदा गुरूवारी धुवाधार पाऊस झाल्याने पावसाने मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तसेच हालात्री नदीला, पांढरी नदीला, तिवोली नाल्याला, कुंभार नाल्याला, पाण्याची पातळी वाढली. तसेच गुंजी भागातील आंबेवाडी किरवाळेवच्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने या गावाचा संपर्क तुटला. तिवोली नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने संपर्क …

Read More »