Thursday , September 19 2024
Breaking News

अवैध वाळू उपसामुळे हालात्री नदीपात्रातील पाणी गढूळ

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यात अवैध वाळू उपसा राजरोजपणे चालू आहे. एकीकडे प्रशासनाने वाळू उपसावर बंदी घातली आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या कृपाशीर्वादाने बेकायदा वाळू उपसा चालू आहे.

मणतुर्गा येथील हालात्री नदीपात्रात खुलेआम बेकायदा वाळू उपसा चालू आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी गढूळ होत आहे. हे गढूळ पाणी जनावरांना पिण्यालायक रहात नाही. तसेच नदीकाठची शेती ही नदीच्या पाण्यावर पिकविली जाते पण वाळू उपसामुळे गढूळ झालेले पाणी शेतात सोडले तर पिकास नुकसानीचे ठरत आहे. त्यामुळे संबंधित खात्याने बेकायदा वाळू उपसावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी शेंडेगाळी, मणतुर्गा परिसरातील शेतकरी करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचा लिंटल भरणी कार्यक्रम संपन्न

Spread the love  खानापूर : मणतुर्गे तालुका खानापूर येथील श्री रवळनाथ मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी १४/०९/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *