खानापूर : खानापूर तालुक्यातील भुरूनकी ग्रामपंचायत हद्दीतील मास्केनट्टी शिवारातील सर्वे नंबर ३० मधील ऊस पिकाचे हत्तीकडून प्रचंड नुकसान झाले आहे.
दरवर्षी हत्ती कडून पिकाचे प्रचंड नुकसान होते. मात्र सरकारकडून कोणतीच आर्थिक नुकसान मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तेव्हा संबंधित वनखात्याने याची दखल घेऊन पिकाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती कारवाई करून तसेच कायमस्वरूपी तोडगा काढवा, अशी मागणी मास्केनट्टी गावच्या शेतकरी वर्गाने केली आहे.
यावेळी गोलिहाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta