खानापूर हिंदूवादी संघटनेचे तहसीलदाराना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : राजस्थानमधील उदयपूर येथे व्यवसायाने टेलर असलेल्या कन्हैयालाल या हिंदू युवकाची भरदिवसा हत्या करण्यात आली. ही घटना साधार नसून सभ्य समाज, संविधान आणि लोकशाही यावरच आक्रमण आहे. या हिंदू युवकाच्या हत्येमागे केवळ महमद रियाज व महमद गवस हे दोनच मुसलमान नसून त्यामागे इस्लामी संघटना जबाबदार आहेत. हिंदूंच्या हत्या करणाऱ्या अशा समाजविघातक प्रवृतींना वेळीच लगाम घातला पाहिजे, यासाठी सरकार, प्रशासनाने लगाम घालावा अन्यथा हिंदू संघटनानाच दोषींवर कारवाई करण्यासाठी संघटीत व्हावे लागले, असा इशारा खानापूर हिंदू संघटनेच्यावतीने पंडित ओगले यांनी तहसीलदार प्रविण जैन यांना निवेदन देताना सांगितले.
शुक्रवारी खानापूरात खानापूर हिंदू संघटनेच्यावतीने लक्ष्मीमंदिरापासून भव्य अशा मोर्चाला सुरूवात केली. त्यानंतर पणजी- बेळगांव महामार्गावरील शिवस्मारक चौकात रास्ता रोको करून इस्लामी संघटनेच्या व हिंदू युवकांच्या हत्येसंदर्भात जोरदार घोषणाबाजी करून महामार्गावरील वाहतूक तासभर थांबविली. त्यानंतर मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी अनेक नेत्यांनी विचारम मांडले व तहसीलदार प्रविण जैन यांना निवेदन सादर केले.
तहसीलदार प्रविण जैन यांनी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खानापूर हिंदू संघटनेचे युवा नेते पंडित ओगले, बजरंग दल प्रमुख नंदकुमार निट्टूरकर, किरण यळ्ळूरकर, जोतिबा रेमाणी, राजेद्र रायका, प्रकाश निलजकर, जयंत तिनेईकर, ऍड. आकाश अथणीकर, पंकज कुट्रे, किरण तुडयेकर, संदिप शमले, आदी शेकडो हिदू कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा
Spread the love बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात …