Sunday , December 7 2025
Breaking News

….तर अधिवेशन काळात कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांना महाराष्ट्र सीमेवर अडवू

Spread the love

 

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

बेळगाव : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेली सुमारे ६९ वर्षे प्रलंबित आहे मुंबई राज्यातील फार मोठा मराठी भाषिक भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी महाराष्ट्र आणि सोमा भागातील मराठी जनता सतत प्रयत्न करीत आहे महाराष्ट्र मिळवण्यासाठी १०६ हुतात्म्यानी बलिदान दिले आहे तसेच शिवसेनेच्या आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनात सुमारे ८५ हुतात्मे झाले आहेत परंतु अनेक आदोलने, सत्याग्रह, केंद्रीय मंत्रिमंडळाशी चर्चा या गोष्टी करून सुद्धा सीमा प्रश्न मार्गी लागू शकला नाही म्हणून २९ मार्च २००४ रोजी महाराष्ट्र सरकारने केंद्र आणि कर्नाटक सरकार यांना प्रतिवादी करून एक दावा दाखल केला आहे या दाव्याची सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी सुरु होणार आहे. दावा दाखल केल्यानंतर कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात केवळ सुनावणी पुढे ढकलून येथील मराठी भाषिकांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे येथील जनतेची भाषा संस्कृती आणि लिपी नष्ट करण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्न करीत आहे याचाच एक भाग म्हणून सीमा प्रदेशात २००६ पासून हिवाळी अधिवेशन भरवण्याचा घाट घातला जातो. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी माणसाच्या वतीने कर्नाटक सरकारच्या कृतीचा आणि केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा महामेळावा घेवून निषेध दरवर्षी करण्यात येतो. गेली अनेक वर्ष या महामेळाव्यास सरकार यास परवानगी देत होते. परंतु अलीकडे दडपशाहीने कर्नाटक सरकार महामेळाव्यास परवानगी देत नाही. याआधी शिवसेना पक्षनेते व इतर पक्षनेते मराठी महामेळाव्यास हजर राहून पाठिंबा देत होते. परंतु अलीकडे शिवसेना नेते महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळातील सदस्य खासदार आमदार व नेतेमंडळी याना बेळगावचे जिल्हाधिकारी प्रवेश बंदी करीत आहेत ही हे कृत्य संविधानाचा सरळ सरळ भंग करत आहे. आठ डिसेंबर २०२५ रोजी कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन बेळगांव येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीने परवानगीसाठी रीतसर अर्ज केला आहे त्याचा विचार न करता मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला आहे आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेते महाराष्ट्रातील नेतेमंडळीना कर्नाटकात प्रवेश बंद करण्याचा प्रयत्न झाला तर अधिवेशन काळात कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्रात प्रवेश बंद करेल. कोल्हापूर आणि सीमा भागातील मराठी भागात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आपल्याला नम्र विनंती करीत आहोत की, बेळगावात मराठी जनतेला आपल्या भावना व्यक्त करण्याचा व्यक्त करण्याच्या कोणत्याही प्रयत्नात प्रशासन अथवा कर्नाटक पोलीस यांनी आडकाठी करु नये व कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास परवानगी द्यावी. आम्ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपणास मागणी करती आहोत.

१) महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावच्या महामेळाव्यास परवानगी देणे संदर्भ आपण जिल्हाधिकारी बेळगाव यांना लेखी विनंती करावी.

२) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेते व इतर पक्षांचे नेते यांना ८ डिसेंबर २०२५ रोजी कर्नाटकात जाणेसाठी बंदी घालू नये अशी लेखी विनंती करावी.

About Belgaum Varta

Check Also

माध्यम प्रतिनिधींनी अधिस्वीकृतीबाबत परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत

Spread the love  इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसोबत कोल्हापूर उपसंचालक कार्यालयात चर्चा कोल्हापूर (जिमाका) : स्वर्गीय शंकरराव चव्हाण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *