
निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य सरकारने पंच हमी योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ अनेक सामान्य कुटुंबियांना होत आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी गळतगा येथे पंचमी योजना कमिटी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या योजनेचा सर्वच गरीब कुटुंबांना लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका गॅरंटी योजना कमिटीचे अध्यक्ष रमेश जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर- पवार होते.
राजेंद्र वडर यांनी, पंचहमी योजनेची ध्येयपूर्ती होत असून तो सर्वसामान्य कुटुंबियापर्यंत पोहोचत आहे. लाभ मिळत नसलेल्या कुटुंबियांनी हमी योजनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. रमेश जाधव यांनी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने सर्वसामान्य कुटुंबाचे हित डोळ्यासमोर ठेवून ‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविली आहे. त्याचा महिला, शेतकरी, विद्यार्थी व गरजू कुटुंबांना थेट लाभ मिळत आहे. राज्यातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास अंमलबजावणी कमिटीचे सदस्य रमेश हरळे, प्रदीप चेंडके, राहुल नसलापुरे, लक्ष्मण शिप्पुरे, राजू कमतनुरे, दगडू वडर, मारुती वडर यांच्यासह आशा, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta