Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

शिवम असोसिएट्स पाठोपाठ अन्य चार संशयित कंपन्या पोलीस रडारवर

  बेळगाव. – बेळगाव जिल्ह्यात ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप शिवम असोसिएट्सवर झाल्यानंतर, जिल्ह्यातील आणखी चार बोगस कंपन्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त मोहम्मद रोशन यांनी दिली. सोमवारी एका कन्नड वृत्तपत्राशी बोलताना मोहम्मद रोशन म्हणाले, गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात केपीआयडी (KPID) आणि बड्स (BUDS) कायद्याअंतर्गत एक विशेष …

Read More »

गो-रक्षणासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत : विहिंप व बजरंग दलाची मागणी

  बेळगाव : जिल्ह्यात वाढत असलेल्या गो-तस्करी आणि गो-हत्येच्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणून गो-हत्त्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या बेळगाव शाखेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांवर योग्य ती कार्यवाही …

Read More »

सर्व्हर समस्येविरोधात रेशन दुकानदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

  बेळगाव : रास्त भाव धान्य दुकानांवरील सततच्या सर्व्हर समस्येमुळे धान्य वितरणात अडथळे निर्माण होत असल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे पाठवण्यात आले. दुकानदारांनी सांगितले की, महिन्याच्या सुरुवातीपासूनच सर्व्हर संथ गतीने कार्यरत असल्याने लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे …

Read More »

सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच अर्जुन गोरल यांना खरी श्रद्धांजली; शोकसभेत मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

  येळ्ळूर :येळ्ळूर गावचे सुपुत्र व महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ व कणखर नेते यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे. ते कडक शिस्तीचे व स्पष्टवक्ते होते. त्यांनी येळ्ळूर गावाला दिशा देण्याचे काम केले. समाजासाठी लढणारा लढवय्या नेता आमच्यातून निघून गेल्यामुळे येळ्ळूर गावचे फार मोठे नुकसान झाले आहे. सीमा …

Read More »

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या श्रीराम कथेचे दि. 2 जून पासून बेळगावात आयोजन

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय व्याख्याते, प्रवचनकार आणि साहित्यिक असलेल्या डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची ‘श्रीराम कथा’ बेळगावात आयोजण्यात आली आहे. दि. २ जून ते दि. ७ जून या कालावधीत केळकर बाग येथील काणे महाराज राममंदिरात दररोज सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत ही रामकथा सादर होणार आहे. वाचकप्रिय असलेल्या डॉ.शेवडे यांची …

Read More »

पहिले रेल्वे गेट कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

बेळगाव : टिळकवाडी परिसरातील पहिले रेल्वे गेट सोमवारी सकाळी अचानक एका बाजूने तुटून खाली कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. शुक्रवार पेठेकडील बाजूचे हे लोखंडी गेट अचानक पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी रहदारी कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेच्या वेळी गेटाजवळून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी सतर्कता दाखवत तत्काळ आपली …

Read More »

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे दि. 27 रोजी राष्ट्रीय सत्संग आणि संस्कार अभियान

  बेळगांव : श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास आणि बाल विकास केंद्र, शाखा बेळगाव यांच्यावतीने देश-विदेश अभियानाच्या वतीने राष्ट्रीय सत्संग आणि संस्कार अभियान आयोजित करण्यात आले आहे. बुधवार दि. 27 मे रोजी श्री बनशंकरी मंगल कार्यालय सपार गल्ली वडगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी गुरुपुत्र सन्माननीय …

Read More »

सचिन पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला; हल्ल्याच्या निषेधार्थ शहापूर पोलिस स्थानकासमोर आंदोलन

बेळगाव : शहापूर परिसरातील रहिवासी सचिन रामचंद्र पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी, २५ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता शहापूर पोलीस ठाण्यासमोर दिव्यांग बांधवांनी एकत्र जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ७.११ वाजण्याच्या सुमारास सचिन पाटील यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये अज्ञात व्यक्तीने …

Read More »

बेवारस वृद्ध महिलेला अखेरचा आधार; सामाजिक बांधिलकीतून पार पडले अंत्यसंस्कार

  बेळगाव : समाजात रक्ताच्या नात्यांपेक्षा माणुसकीचे नाते श्रेष्ठ असल्याचे दाखवून देणारी घटना बेळगावमध्ये घडली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालेल्या एका बेवारस वृद्ध महिलेला पोलीस विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून सन्मानपूर्वक अंतिम निरोप देण्यात आला. माहितीनुसार, वृद्ध महिलेचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ओळख पटण्याच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आला होता. मात्र दीर्घकाळ …

Read More »

साहित्यिकांनी समाजाला दिशा द्यावी; बेळगाव साहित्य संमेलनात डॉ. यशवंत पाटणे यांचे आवाहन

  बेळगाव : समाजात वाढत चाललेल्या धार्मिक, भाषिक आणि सामाजिक दुभंगाच्या पार्श्वभूमीवर साहित्यिकांनी निर्भयपणे सत्य मांडत समाजाला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. मातृभाषा ही केवळ संवादाचे साधन नसून संस्कृतीची ओळख आणि समाजाच्या अस्मितेचा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखिल भारतीय मराठी साहित्य …

Read More »