Friday , October 18 2024
Breaking News

केंद्रीय मंत्री सीतारामन व इतरांविरुध्द एफआयआर दाखल

Spread the love

 

 

लोकप्रतिनिधी न्यायालयाचे निर्देश; निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळल्याचा आरोप

बंगळूर : येथील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर नेत्यांविरुद्ध आता रद्द केलेल्या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने बंगळुरमधील टिळक नगर पोलीस ठाण्याला निवडणूक बाँड योजनेशी संबंधित फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आणि त्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर महत्त्वपूर्ण चिंता व्यक्त केली.
त्यानुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, माजी खासदार नलिन कुमार कटील आणि इतरांविरुद्ध निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या कथित खंडणीप्रकरणी शनिवारी बंगळुरमधील टिळकनगर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जनाधिकार संघर्ष परिषदेचे (जेएसपी) आदर्श अय्यर यांनी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत.
बंगळूरच्या लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने काल त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. सत्तेचा गैरवापर करून निवडणूक बाँड मिळवल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जनाधिकार संघर्ष संघाचे (जेएसपी) आदर्श अय्यर यांनी निर्मला सीतारामन आणि इतरांनी निवडणूक रोख्यांच्या बहाण्याने खंडणीचे रॅकेट चालवल्याचा आरोप केला आहे.

सीतारामन आरोपी ए १
एकूण पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले असून निर्मला सीतारामन या ए १ आरोपी आहेत. ईडी अधिकारी ए २, केंद्रीय भाजप पदाधिकारी ए ३, नळीन कुमार कटील ए ४, बी. वाय विजयेंद्र ए ५, राज्य भाजप पदाधिकारी ए ६ आरोपी आहेत.
आयपीसी कलम ३८४ (खंडणी), १२० बी (गुन्हेगारी कट), ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगळुरच्या एका न्यायालयाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर नेत्यांविरुद्ध आता रद्द केलेल्या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळल्याच्या आरोपावरून एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते.
न्यायालयाने बंगळुरमधील टिळक नगर पोलीस ठाण्याला निवडणूक बाँड योजनेशी संबंधित आर्थिक व्यवहारांबद्दल चिंता व्यक्त करून खंडणीच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

सिध्दरामय्यांचा सवाल
न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटक भाजपला जाहीरपणे प्रश्न केला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सीतारामन यांच्या विरोधात आंदोलन कधी सुरू करणार असा प्रश्न करून कथित “घोटाळ्या” संदर्भात त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली, त्यांनी केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचाही राजीनामा मागितला.
“लोकप्रतिनिधी न्यायालयाने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्या विरोधात निवडणूक रोखे घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी कर्नाटक भाजपचे नेते आंदोलन कधी करणार? या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली तर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जामिनावर असलेले कुमारस्वामी यांचाही राजीनामा घ्यावा लागेल, असे त्यांनी एक्स मधील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

कुमारस्वामींचा प्रतिप्रश्न
यानंतर कुमारस्वामी यांनी शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यांच्या आणि निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रश्न केला आणि विचारले की निवडणूक रोख्यांची रक्कम त्यांच्या “वैयक्तिक खात्यात” गेली का?
“मुख्यमंत्री, माझा आणि निर्मला सीतारामन यांचा राजीनामा मागत आहेत. होय, कोर्टाने एफआयआर दाखल करण्यास सांगितले पण ते निवडणूक रोखेचे पैसे त्यांच्या वैयक्तिक खात्यात गेले का? त्यांनी आणि मी राजीनामा का द्यावा?” असे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

आयटी कंपन्यानाही लाल-पिवळा फडकावण्याची सक्ती

Spread the love  बंगळूर : यावर्षी १ नोव्हेंबर रोजी ५० वा कन्नड राज्योत्सव भव्य पद्धतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *