Wednesday , March 4 2026
Breaking News

एका महिन्यात शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई : मंत्री कृष्णा बैरेगौडा यांची माहिती

Spread the love

 

बंगळूर : अतिवृष्टीमुळे १.५८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील एका महिन्यात भरपाई दिली जाईल, असे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी शुक्रवारी सांगितले. सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर गौडा यांनी ही माहिती दिली.
“गेल्या एका महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले असून डेटा एंट्री अंतिम टप्प्यात आहे. पिकाचे १२० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एका आठवड्याच्या कालावधीत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाई जमा केली जाईल, असे गौडा म्हणाले.
गौडा म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांकडे ६४२ कोटी रुपये आहेत, ज्याचा उपयोग त्वरीत नुकसानभरपाई देण्यासाठी केला जाईल. राज्याच्या काही भागात घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जीवितहानीही झाली. एकूणच, नुकसानभरपाईचे १६२ कोटी रुपये आधीच जारी करण्यात आले आहेत, असे मंत्री म्हणाले.
गौडा म्हणाले की, १५ डिसेंबरपर्यंत बगैर हुकुम अंतर्गत किमान पाच हजार अर्जदारांना लागवडीचे प्रमाणपत्र दिले जाईल, जे सार्वजनिक जमिनींच्या अनधिकृत कब्जांच्या नियमितीकरणाशी संबंधित आहे.
बगैर हुकुम अंतर्गत लाखो लोकांनी जमिनीसाठी अर्ज केले आहेत. आम्ही पात्र म्हणून १.२६ लाख अर्जांचा विचार करत आहोत, पहिल्या टप्प्यात पाच हजार अर्ज निकाली काढण्याचे लक्ष्य आहे. जानेवारीपर्यंत ते १५०००-२०००० पर्यंत वाढेल, असे ते म्हणाले.
बगैर हुकुमच्या पात्र लाभार्थ्यांना डिजिटल लागवडीचे प्रमाणपत्र दिले जाईल, असे गौडा म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *