Tuesday , March 3 2026
Breaking News

विजयपूर जिल्ह्यात कार आणि ट्रक भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

विजयपूर : विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील अर्जुनगीजवळ कार आणि ट्रक यांच्यात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कार विजयपूरहून जमखंडीच्या दिशेने जात होती. यावेळी ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात अर्जुन कुशल सिंह रजपूत, रविनाथ पत्तार, पुष्पा रविनाथ, मेघराज रजपूत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बबलेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *