Monday , December 8 2025
Breaking News

विजयपूर जिल्ह्यात कार आणि ट्रक भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

विजयपूर : विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील अर्जुनगीजवळ कार आणि ट्रक यांच्यात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कार विजयपूरहून जमखंडीच्या दिशेने जात होती. यावेळी ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात अर्जुन कुशल सिंह रजपूत, रविनाथ पत्तार, पुष्पा रविनाथ, मेघराज रजपूत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बबलेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *