Sunday , September 8 2024
Breaking News

हक्कासाठी शेतकर्‍यांची एकजूट आवश्यक

Spread the love

राजू पोवार : रयत संघटनेच्या जैनवाडी शाखेचे उद्घाटन
निपाणी : नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतकरी वर्षानुवर्षे अडचणीत सापडला आहे. महापूर व कोरोना काळात पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. पण केवळ सर्वेच झाला असून आजतागायत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी रयत संघटना कार्यरत असून त्यासाठी शेतकर्‍यांची एकजूट महत्त्वाची आहे, असे मत चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. जैनवाडी येथे आयोजित कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करून अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कालगौडा कोटगे, बेनाडीचे अध्यक्ष विवेक जनवडे, मलगौडा मिरजे उपस्थित होते. राजू पोवार म्हणाले, केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायदा मारक ठरत आहे. त्याच्या विरोधासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणार्‍या शेतकर्‍यांना चिरडण्याचा होणारा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संघटना मजबूत असून प्रत्येकाने संघटनेच्या कामात झोकून द्यावे.
यावेळी युवा अध्यक्ष बाळासाहेब हदीकर, कार्याध्यक्ष प्रविण सुतळे, राजू पाटील, महेश जनवडे, जगदीश, मंगवते, नाना कुंभार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास नामदेव साळुंखे, कुमार पाटील, बाळासो साळुंखे, नामदेव मारुती साळुंखे, राजेंद्र साळुंखे, संपत साळुंखे, राहुल साळुंखे, मोहन माळी, दिलीप कांबळे, अरुण हुक्कीरे, किरण कांबळे, आप्पासो पाटील, बाळासो कासुटे, सतीश कांबळे, कुमार तावदरे, संदीप तावदारे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *