Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

महिला विद्यालयाचा शतक महोत्सव कार्यक्रम मे महिन्याच्या अखेरीस

  बेळगाव : “बेळगाव शहरातील मराठी माध्यमातील मुलींची अग्रेसर शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या महिला विद्यालय या संस्थेला येत्या 27 मे रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त शतक महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला आहे”अशी माहिती संस्थेचे चिटणीस ऍड. श्री. विवेक कुलकर्णी यांनी बोलताना दिली. …

Read More »

बारावी पुरवणी परीक्षा 23 पासून

  बेळगाव : व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाची असणारी सीईटी २० ते २२ मेपर्यंत होणार आहे. त्यामुळे बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार २३ मेपासून पुरवणी परीक्षेला विविध केंद्रांवर सुरुवात होणार आहे. ९ ते २९ मार्चपर्यंत बारावीची परीक्षा झाली होती. काही दिवसांतच पेपर तपासणीचे काम करून १५ दिवसांत बारावीचा निकाल …

Read More »

कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम, सिद्धरामय्यांचे पारडे जड?, डी. के. शिवकुमार आज दिल्लीला जाणार

  बेंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण? यावरुन अजूनही सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आज दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या कालच दिल्लीत दाखल होऊन तेथे तळ ठोकून आहेत. तर शिवकुमार पोटदुखीने त्रस्त असल्याने बंगळूरमध्ये राहिले. शिवकुमार काल …

Read More »

टिळकवाडीत बर्निंग कारचा थरार

बेळगाव (प्रतिनिधी) : टिळकवाडीतील खानापूर रोडवर भर रस्त्यात डस्टर कारने अचानक पेट घेतल्याने चांगलीच तारांबळ उडाली. रात्री नऊच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. खानापूर रोडवरील कॉसमॉस बँकेसमोर घडलेल्या या प्रकाराने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे अन्य मार्गांवर रहदारीचा ताण वाढला होता. रहदारीच्या मार्गावरील …

Read More »

शिवजयंती चित्ररथ मिरवणूकीची जय्यत तयारी

  बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवार दि. २७ मे रोजी काढली जाणार आहे. जिवंत देखावे, लाठी मेळा, ढोल-ताशा, ध्वजपथक, लेझीम मेळा, हत्ती-घोडे अशा शिवमय वातावरणात चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. यासाठी शिवभक्तांकडून तसेच युवक मंडळांकडून जय्यत तयारी केली जात आहे. अवघे बारा दिवस शिल्लक राहिल्याने साहित्याची जमवाजमव, शिवचरित्रावरील प्रसंग …

Read More »

भ्रष्टाचार विरहित मतदारसंघाचा विकास व्हावा

  डॉ. राजेश बनवन्ना; आम आदमी पक्षाची बैठक निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघातचा दौरा केला. यावेळी मतदारांना आम आदमी पक्षाची ध्येय धोरणे पटवून दिली. पण या परिसरात हा पक्ष नवीन असल्याने पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. तरीही मतदारसंघातील विकास कामासाठी आपण आग्रह धरणार असून भ्रष्टाचार विरहिरीत मतदार …

Read More »

“…तर अपात्रतेचा निर्णय घेण्यास विलंब होईल”, लंडनहून परतताच विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान

  मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय दिला आहे. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. राहुल नार्वेकर हे लंडन दौऱ्यावर गेले होते. ते लंडन दौऱ्यावरून नुकतेच मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नार्वेकरांनी अपात्रतेच्या निर्णयाबद्दल …

Read More »

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीला रवाना

  बेंगळुरू : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाच्या निवडीवरून गोंधळ उडाला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीला रवाना झाले असून आमदार जमीर अहमद यांनीही सिद्धरामय्या यांच्यासोबत दिल्लीचा प्रवास केला आहे. एकीकडे केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावत आहेत, …

Read More »

काकासाहेब पाटलांना महामंडळात स्थान द्या

  काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक : लवकरच वरिष्ठ नेत्यांना भेटणार निपाणी : विधानसभा निवडणुकीतील काकासाहेब पाटील यांच्या पराजयाला आपणच जबाबदार असल्याचे सांगितले आहे. त्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली असून गेल्या ४० वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या काकासाहेब पाटील यांना महामंडळावर स्थान द्यावे, अशी मागणी निपाणी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. सोमवारी …

Read More »

रेल्वेच्या धडकेत 15 हून अधिक म्हशींचा मृत्यू

  मंगळुरू : रेल्वेच्या धडकेने 15 हून अधिक म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळुरूजवळील जोकट्टे येथील अंगरगुंडी येथे घडली. वृत्त कळताच कद्री अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून रुळावरील गुरांचे मृतदेह बाहेर काढले. एक मालगाडी कंकनाडीहून एमसीएफच्या दिशेने येत होती. रेल्वेच्या आवाजाने घाबरलेल्या म्हशी रेल्वे पुलावर धावू लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती …

Read More »