Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

गुरु पौर्णिमेनिमित्त श्रीदत्त बाल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

  खानापूर : रामनगर येथील श्री दत्त मंदिर ट्रस्ट कमिटीचे श्री दत्त मंदिर या ठिकाणी सुरू असलेल्या श्री दत्त बाल संस्कार केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त अर्थात श्री महर्षी वेदव्यास जयंती मोठ्या भक्ती भावाने साजरी करण्यात आली. प्रारंभी मंदिराचे पुजारी श्री मोहन आंबेकर यांनी श्री दत्तात्रेयाला अभिषेक घातला. तद्नंतर संस्कार केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी …

Read More »

केंद्रीय मंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी, भाजपने निवडणुकांसाठी आखली रणनिती

  नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकांसाठी कायमच रणनिती आखली जाते. अगदी ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत भाजपमध्ये चाणक्यनिती करत अनेक संघटनात्मक व पक्षीय बदल घडवले जातात. सध्या भाजपाकडून मिशन लोकसभा आखण्यात आलं असून त्यासाठीची तयारीही सुरू करण्यात आलीय. तत्पूर्वी आता ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. …

Read More »

माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर

  मुंबई : भारताचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकर याला बीसीसीआयने मोठी जबाबदारी दिली आहे. अजित आगरकरची टीम इंडियाचा निवड समिती अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अशोक मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या क्रिकेट सल्लागार समितीने अजित आगरकर याची मुलाखत घेतली, त्यानंतर त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. याआधीही अजित आगरकरने या …

Read More »

अनैतिक संबंधाच्या संशयातून अंकलगी येथे दोघांचा खून

  बेळगाव : अनैतिक संबंधाच्या संशयातून बेळगाव जिल्ह्यातील अंकलगी पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या अक्कतंगेरहाळ येथे मंगळवारी दोघांचा खून करण्यात आला आहे. अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन जगदरा (वय ४०) आणि रेणुका माळगी (वय ४२) अशी मृतांची नावे …

Read More »

गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जीवनात पुढे जावे : किरण जाधव

  बेळगाव : जीवनात गुरुचे अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच ‘गुरुविण कोण दाखवील वाट’ असं म्हटलं जातं. प्रत्येकांनी गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जीवनात वाटचाल करून यशोशिखर गाठावे असे भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आणि सखल मराठा समाजाचे नेते किरण जाधव म्हणाले. गोंधळी गल्ली बेळगाव येथील श्री दत्त मंदिर येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप …

Read More »

म्युनिसिपल हायस्कुलचे शिक्षक भाइनाईक यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल हायस्कुल मधील शिक्षक रमेश सिद्धाप्पा भाइनाईक हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त भाइनाईक व त्यांच्या पत्नी सरोजिनी देवी तुप्पद दांपत्याचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका रविकुमारी चव्हाण होत्या. यावेळी भाइनाईक यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांनी प्रमाणिकपणा, प्रयत्न, सत्य, गुरुनिष्ठा, मोठ्यांचा आदर करणे, असे …

Read More »

स्तवनिधी अरुण शामराव पाटील स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित श्री अरुण शामराव पाटील हायस्कूल व श्री पी. जी. विद्यामंदिर स्तवनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा कार्यक्रम, रेसलिंग अकॅडमी उद्घाटन व तायक्वांदो सेंटर म्हणून स्तवनिधीला मिळालेला मान अशा त्रिवेणी कार्यक्रम साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संचालक महावीर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष पोटी-भुवनेश्वर …

Read More »

शिवरायांच्या पवित्र पादुकांचे उद्या निपाणीत आगमन

  निपाणी : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्य पादुकांचे किल्ले शिवनेरीवरून प्रस्थान झाले आहे. या सोहळ्याचे हे 9 वर्ष असून परंपराने 29 वे वर्षे चालू आहे निपाणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्या पादुकांचे श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधीश परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या प्रयत्नाने यावर्षी ही शिवभक्तांना शिवरायांच्या दिव्य पादुकांचे यावर्षीही …

Read More »

रोटरीकडून मराठी विद्यानिकेतन शाळेला खेळाचे साहित्य भेट

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्या वतीने मराठी विद्यानिकेतन बालवाडीसाठी खेळाचे साहित्य भेट देण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, सदस्य महेश अनगोळकर, सोमनाथ कुडचीकर, डी. बी. पाटील उपस्थित होते. शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. रोटरीच्या वतीने बालवाडी च्या मुलांसाठी फिरता झोपाळा, …

Read More »

मुंबई -आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात; 12 जणांचा चिरडून मृत्यू

  मुंबई : धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त …

Read More »