घाणीचे साम्राज : शेतकरी आक्रमक कोगनोळी : महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या कालव्यात गाळ व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे. पाणी कमी येत असल्याने कर्नाटक सीमा भागातील पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. यासाठी कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातील म्हाकवे गावापासून कर्नाटक हद्दीतील कालव्यातील गाळ व स्वच्छता …
Read More »टिळकवाडी परिसरात “शिवसन्मान” पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील “शिवसन्मान” पदयात्रेला आज शनिवारी सकाळी टिळकवाडी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर पदयात्रेचे सर्वत्र उत्साही स्वागत करून पाठिंबा व्यक्त करण्यात आला. शिवछत्रपतींच्या सन्मानार्थ तसेच मराठी अस्मिता, भाषा आणि संस्कृतीसह मराठी माणसांच्या एकजुटीचे संवर्धन करण्यासाठी येळ्ळूर राजहंस गडावरून दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र …
Read More »म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने केली आझाद मैदानाची पाहणी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मंगळवार दिनांक 28 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. काल शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांसह आंदोलन स्थळी पाहणी केली तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या राहण्याची सोय पनवेल व वाशी येथे केल्याची माहिती दिली. आंदोलनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर समितीचे …
Read More »कर्नाटक राज्यातील हाॅल्टिकल्चर काॅलेजच्या विद्यार्थ्याचे नॅशनल लेव्हल एनएसएस योजनेंतर्गत स्पर्धेत यश
खानापूर (प्रतिनिधी) : नॅशनल लेव्हल राष्ट्रीय सर्विस योजनेंतर्गत दि. १४ फेब्रुवारी ते दि. २० पर्यंत आम्बाला (हरियाणा) येथील महर्षि मार्केडेश्वर डीम्ड विद्यापीठ येथे देशातील १७ राज्यातील विविध काॅलेजच्या २०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन कर्नाटक राज्यातील हाॅल्टिकल्चर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी शिर्शि …
Read More »तळेवाडमधून अरण्य अतिक्रमित धारकांचे प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका वन हक्क संघर्ष समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील गवळी धनगर व पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांच्या अरण्यहक्काचे प्रस्ताव बनविण्याची प्रक्रिया येथील तळेवाड गवळी धनगरवाड्यावरून आज सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील सर्व गवळी धनगर व अरण्य अतिक्रमित जमीन धारकांचे लवकरच बनविण्याची प्रक्रिया पूर्ण करून परिपूर्ण असे दावे लवकरच अरण्य …
Read More »“शिवसन्मान” पदयात्रेचे विविध भागात जल्लोषी स्वागत
समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांना पाठिंबा बेळगाव (प्रतिनिधी) : मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि मराठी स्वाभिमान जपण्यासाठी काढण्यात आलेल्या आजच्या “शिवसन्मान” पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी पिरनवाडी ते भवानीनगर या भागात भगव्याचा जागर करण्यात आला. पिरनवाडी येथून शिवनावाचा जयघोष करीत शिवसन्मान पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. ब्रह्मनगर, खादरवाडी, राजारामनगर या …
Read More »बीपीएल कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला १० किलो मोफत तांदूळ कॉंग्रेसची तिसरी घोषणा
बंगळूर : कर्नाटक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसरी ‘हमी’ योजना जाहीर केली, अन्न भाग्य योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रत्येकसदस्याला दरमहा दहा किलो मोफत तांदूळ देण्याचे आश्वासन दिले. शुक्रवारी (ता. २४) बंगळुर येथे एका एका पत्रकार परिषदेत बोलताना प्रद्श कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी जाहीर केले, की पक्षाच्या …
Read More »1132 कोटी रुपयांच्या जलजीवन प्रकल्पांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन : मंत्री कारजोळ
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जिल्ह्यात आगमन सर्वांसाठी पर्वणी ठरणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत, अशी विनंती जिल्हा पालक मंत्री गोविंद काराजोळ यांनी केली. २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मालिनी सिटी मैदानावरील तयारीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. कृषी सन्मान योजनेचे निधी हस्तांतरण, रेल्वे विकास प्रकल्प आणि …
Read More »रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण आणि लोंढा-बेळगाव- घटप्रभा दुपरीकरण मार्गाचे उद्घाटन
मंत्री गोविंद कारजोळ यांची माहिती बेळगाव : मंगळवार दिनांक 27 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावला येत आहेत. या दौऱ्या दरम्यान ते विविध विकास कामांचा शुभारंभ आणि नव्या कामांना चालना देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण आणि बेळगाव, लोंढा, घटप्रभा या मार्गावर झालेल्या रेल्वेच्या दुपदरीकरण कामाचे उद्घाटन …
Read More »अनगोळ बालकावर मोकाट कुत्र्याचा हल्ला
कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी नागरिकांवर चाल करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आदर्श नगर राम कॉलनी येथील एका इसमाचा बळी गेला आहे. मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाची माहिती असली तरीही महापालिका या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta