Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

दिल्लीत राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसचं तीव्र आंदोलन

  नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चौकशीच्या विरोधात काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काँग्रेसकडून देशभरात निषेध मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आज दुसर्‍यांदा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. सोनिया गांधींच्या या चौकशीमुळे …

Read More »

भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का! नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

  नवी दिल्ली : बर्मिंगहममध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेआधी भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नाही. काही दिवसांपूर्वीच जागतिक ऍथलेटिक्समध्ये रौप्य पदकाची कमाई करणारा नीरज दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी बर्‍याचदा चांगली …

Read More »

दारुबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारुमुळं 25 जणांचा मृत्यू, चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

  अहमदाबाद : दारुबंदी असलेल्या गुजरात राज्यात विषारी दारुमुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरातच्या बोटाद शहरातही ही घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारनं एसआयटीची स्थापना केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात गावठी दारु बनवणार्‍या आणि विकणार्‍या 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या …

Read More »

कांजळे लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी दयानंद वाणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील कांजळे लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसीच्या अध्यक्षपदी दयानंद वाणी तर उपाध्यक्षपदी सौ. स्वाती भांतकांडे यांची निवड केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर होते. प्रारंभी मुलींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक एस. एम. पालकर यांनी उपस्थितांचे स्वागत …

Read More »

मंगाईदेवी यात्रेला उत्साहात सुरुवात : लाखो भाविकांची गर्दी

  बेळगाव : वडगावची आराध्य दैवत श्री मंगाईदेवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा साजरी करण्यात आली नव्हती. यावर्षी मात्र उत्साहात साजरी होत आहे. वडगावच्या मंगाईदेवीच्या यात्रेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. मंदिरचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. गोवा, महाराष्ट्र आदी ठिकाणांहून आलेल्या हजारो भाविकांनी देवीचे दर्शन …

Read More »

’धनुष्य बाण’ कोणाचा? शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 1 ऑगस्ट रोजी सुनावणी

  मुंबई : शिवसेना पक्षावर कोणाचा दावा खरा आहे, हे पाहण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला नोटीस बजावली होती. निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट 1 ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार आहे. राज्यातील सत्तापेचावर शिवसेना आणि …

Read More »

अथणी येथे कालव्यात आढळला मृतदेह

  बेळगाव : अथणी येथील पाटबंधारे कालव्यात संशयास्पदरित्या एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी या तालुक्यातील यक्कंची या गावातील पाटबंधारे योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामकाजातील कालव्यात एका युवकाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. सदर बाब लक्षात येताच गळी पोलीस स्थानकात ग्रामस्थांनी माहिती दिली असून तातडीने बचावकार्य पथक …

Read More »

उमेश उदय काळे यांना पीएचडी प्रदान

बेळगाव : अनगोळ रोड वरील नागरिक आणि अंगडी कॉलेजचे प्राध्यापक श्री. उमेश उदय काळे यांना कर्नाटक विश्वविद्यालयातर्फे पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. डोमेस्टिक वॉटर मॅनेजमेंट इन बेळगाव या विषयावर त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाला ही पीएचडी देण्यात आली आहे. त्यांना डॉ. एच. एस. भरडी यांचे मार्गदर्शन लाभले असून ते …

Read More »

‘स्वरगंध’चा स्वरांकित गुरुवंदना सोहळा; विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गाण्यांमुळे श्रोते मंत्रमुग्ध

गुरुवंदनेचा हृद्य सोहळा स्वरगंध दरवळला गायन-वादन कल्लोळ झाला जणू नादब्रह्म अवतरला… असेच काहीसे वर्णन गुरुवंदना या कार्यक्रमाचे करावे लागेल. शहापूर कचेरी गल्लीतील स्वरगंध विद्यालयातर्फे दि. 24 रोजी सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यालयाच्या विविध वयोगटातील शिष्यांनी सरस गाणी सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. विद्यालयाच्या संचालिका सौ. भाग्यश्री …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिलांचा विकास; मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन

कोगनोळी : चूल आणि मूल यातून महिलांनी बाहेर पडून उद्योग व्यवसाय केला पाहिजे. शिक्षणाबरोबर संस्कार शिकले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिलांचा विकास झाला असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले. येथील प्रियंका संकेश्वरे व महेश संकेश्वरे या दाम्पत्यांना मंत्री जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून १० लाख रुपये मंजूर झालेल्या बेकरी …

Read More »