नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरु असताना भारतीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार असल्यामुळे निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उपराष्ट्रपतीपदासाठी ६ ऑगस्टला मतदान होणार आहे. त्या निवडणुकीचा निकाल त्याच …
Read More »एनसीसी छात्रांसाठी वाहतूक जनजागृती कार्यक्रम संपन्न
बेळगाव : जाधवनगर येथील 26 कर्नाटका एनसीसी बटालियनतर्फे एनसीसी छात्रांसाठी आयोजित वाहतूक कायदा व नियम जनजागृती कार्यक्रम आज बुधवारी पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बेळगाव दक्षिण रहदारी पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक उपस्थित होते. नाईक यांनी एनसीसी छात्रांना वाहतुकीबद्दल असणारे कायदे, नो-पार्किंग, ड्रिंक अँड ड्राइव्ह, वेगावर नियंत्रण …
Read More »सर्व गावांना स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : येत्या तीन महिन्यात जिल्ह्यातील सर्व गावांना स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी (दि. २९ जुलै) अनुसूचित जाती (आदिवासी नियंत्रण) जिल्हा जागृती व कारभारी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. स्मशानभूमी नसलेल्या खाजगी जागा खरेदी करण्यास शासनाने …
Read More »अथणी शुगर्सचे पाटील बंधू ब्राझील दौऱ्यावर
साखर, इथेनॉल उत्पादनाची माहिती घेण्यासाठी देशभरातून प्रतिनिधी रवाना बेळगाव : ब्राझील येथील साखर व इथेनॉल उत्पादन अत्याधुनिक प्लांटचा अभ्यास करण्यासाठी युवा उद्योजक बंधू श्रीनिवास श्रीमंत पाटील व योगेश श्रीमंत पाटील हे दोघे ब्राझीलला रवाना झाले. देशभरातील अनेक साखर कारखान्यांचे प्रतिनिधींनीही यामध्ये सहभाग घेतला आहे. ब्राझील येथील साखर कारखानदारी, तेथील इथेनॉल …
Read More »दुष्काळी गावांना ऐनापूर कालव्याद्वारे पाणी
आ. श्रीमंत पाटील यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांकडून विद्युत पंप सुरू अथणी : पावसाने ओढ दिल्याने अथणी व कागवाड तालुक्यातील काही गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आपण बंगळूरला असलो, तरी शेतकरी व नागरिकांचे हाल नकोत, यासाठी ऐनापूर कालव्याद्वारे पाणी सोडा, अशी सूचना माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी अधिकार्यांना …
Read More »हिरण्यकेशीत मासेमारीला उधाण..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हिरण्यकेशी नदीला पावसाचे नवीन पाणी आल्यामुळे मासेमारीला उधाण आलेले चित्र पहावयास मिळाले. हिरण्यकेशी नदीला आलेले नवीन पाणी पहाण्यासाठी लोकांनी एकीकडे गर्दी केलेली असताना युवकांनी मासेमारी करण्यासाठी गर्दी केलेली दिसली. नदीतील नवीन पाण्यातून गळाला मोठे मासे लागत असल्याच्या चर्चेतून नदी काठावर मासेमारीसाठी युवकांची मोठी गर्दी झालेली …
Read More »संकेश्वर येथील मारुती गल्लीत “झुडपे उगवली” राव…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १७ मधील मारुती गल्लीतील मातीचे ढिगारं हटविण्याचे काम पालिकेने गेल्या तीन महिन्यांपासून केलेले नसल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यात आता झुडपे उगवलेली दिसताहेत. पालिकेचे एक काम बारा महिने थांब सारखा प्रकार चालल्याची तक्रार येथील लोकांनी केली आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना येथील नागरिक रवि कंबळकर म्हणाले, मारुती …
Read More »श्रीक्षेत्र वल्लभगड येथून पायी दिंडीचे प्रस्थान
संकेश्वर (महंमद मोमीन) : श्रीक्षेत्र वल्लभगड येथून आज विठूरायाच्या नाम गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात भक्तीमय वातावरणात श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडीचे प्रस्थान झाले. वल्लभगड श्रीराम मंदिर येथे दिंडी चालक हभप हैबती वाघमोडे यांनी विणापूजन करुन दिंडी सोहळ्याला चालना दिली. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली वल्लभगड पायी दिंडी सोहळा …
Read More »औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतर
मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे मोठे 10 निर्णय मुंबई : आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. मंगळवारी देखील कॅबिनेटची बैठक झाली. 24 तासात राज्य मंत्रिमंडळाची …
Read More »बरगाव पंचायतीला टाळे ठोकताच पीडिओंनी दिले कामे करण्याचे आश्वासन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बरगाव पंचायतीकडून नागरिकांची कोणतीच कामे केली जात नव्हती. त्यामुळे बरगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील नागरिक हैराण झाले होते. त्याचबरोबर बरगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील के. पी. पाटील प्लॉटमधील नागरिकांना उतारे देण्यास टाळाटाळ होत होती. गेली अनेक वर्षे उतारा मिळण्यासाठी के. पी. पाटील यांनी सतत बरगाव ग्राम पंचायतीला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta