Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

देशात अघोषित आणीबाणीची परिस्थिती नाही : बसवराज बोम्मई

भारतीय संविधान जगात सर्वोत्त बंगळूर : भगवा पक्ष देशावर अघोषित आणीबाणी लादत असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांवर हल्ला चढवत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देशात अघोषित आणीबीणीची परिस्थिती नसल्याचे सागितले. १९७५ मध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यासाठी भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. लोक म्हणतात की अघोषित …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने वडगावमध्ये चिकुनगुनिया, डेंग्यू लसीकरण

बेळगाव : पावसाळा सुरु झाला आहे त्यामुळे पावसाळी रोगांच्या प्रसाराची शक्यता गृहीत धरून वडगांव येथील देवांग नगर चौथ्या क्रॉससह भागातील नागरिकांना श्रीराम सेना हिंदुस्तान, डॉ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने जवळपास 500 जणांना डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लस देण्यात आली. यावेळी चेतन खन्नूकर, महेश जाधव, कौशिक पाटील, अण्णा पैलवानाचे, काशिनाथ मुचंडी, मंजुनाथ शिंदे, …

Read More »

शिंदे गटाचे १६ बंडखोर आमदार अपात्र ठरणारच, शिवसेनेला विश्वास; वकिलांनी मांडली कायदेशीर बाजू!

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या गटातील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. मात्र, कायदेशीर आधारांवर ही नोटीस तग धरू शकणार नाही आणि संबंधित आमदार अपात्र ठरू शकत नाही, असा दावा …

Read More »

बी. एस. चन्नबसप्पा टेक्स्टाईल मॉलचे शानदार उद्घाटन

बेळगाव : बेळगावातील कापड व्यवसाय क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल ठरणाऱ्या बी. एस. चन्नबसप्पा टेक्स्टाईल मॉलचे उद्घाटन रविवारी शानदार कार्यक्रमाद्वारे पार पडले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उपस्थित राहून शोरूम संचालकांना शुभेच्छा दिल्या. तसेच या उद्घाटनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात बोलताना कर्नाटकाच्या उद्योग व्यवसायाची प्रगती व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. राज्य सरकारने …

Read More »

सरदार मैदानातून उद्या सकाळी 11 वाजता मराठी परिपत्रकांच्या मोर्चाला सुरुवात : मध्यवर्ती समितीची माहिती

बेळगाव : मराठी परिपत्रकांसाठी काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चाची सुरुवात सोमवार 27 रोजी सकाळी 11 वाजता सरदार मैदानातून होणार आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना आडकाठी केल्यास मराठी भाषिकांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करावं आणि प्रशासनाचा निषेध नोंदवावा, असे आवाहन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.

Read More »

महामोर्चाला हजारोंच्या संख्येने सामील व्हा : माजी आमदार दिगंबरराव पाटील यांचे आवाहन

  खानापूर : मराठी कागदपत्रांसाठी २७ रोजी होणाऱ्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. रविवारी खानापूर बाजारपेठ येथे मोर्चात सहभागी होण्यासाठी पत्रके वाटण्यात आली. खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने खानापूर बाजारपेठेत माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या नेतत्वाखाली जागृती दौरा आयोजित …

Read More »

बंडखोर आमदारांच्या घरांना आता केंद्राची सुरक्षा, सीआरपीएफचे जवान तैनात

मुंबई : बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून …

Read More »

फुटीरवाद्यांना माफी नाही, १५ ते १६ आमदार संपर्कात : आदित्य ठाकरे

मुंबई : फुटीरतावादी लोक शिवसेनेत नकोत. त्यांना आता माफ करणार नाही. ज्यांना जायचे त्यांना जाऊ दे, असे स्‍पषट करत बंडखोर एकनाथ शिंदे गटातील १५ ते १६ आमदार संपर्कात आहेत, असा दावा युवासेनेचे प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (दि.२६) येथे केला. ते सांताक्रुझ येथील युवासेनेच्या मेळाव्यात बोलत होते. …

Read More »

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : राजू पोवार

बंबलवाड येथे शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कटिबद्ध आहे. सरकार कुणाचेही असो शेतकरी बांधवांच्या समस्या कायम आहेत. शेतकऱ्यांचे नावे घेऊन सत्तेवर यायचे आणि शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणे राबवायची असे सरकारचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्यास सरकार असमर्थ ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती खुंटते …

Read More »

कथालेखन माणसांच्या वेदनावरील वास्तव असावे

चंद्रकांत निकाडे : कुर्ली हायस्कूलमध्ये कथालेखन कार्यशाळा निपाणी (वार्ता) : समाज जो जगतो त्याचे प्रतिनिधीक साहित्यातून पुढे येत असते. सध्याच्या धावपळीच्या काळात वाचन व लेखन याकडे दुर्लक्ष होत आहे. कथा लेखकांनी माणसांच्या वेदनावर वास्तव लिहिले पाहिजे. यासाठी आपल्या लेखणीतून माणसाच्या काळजाला भिडणारे कथालेखन निर्माण करावे, असे मत ज्येष्ठ बाल साहित्यीक …

Read More »