Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

अलतगा दुर्घटनेतील “त्या” युवकाच्या कुटुंबाला ५ लाखाचा धनादेश

  बेळगाव : दोन दिवसांपूर्वी पाण्यात वाहून गेलेल्या अलतगा येथील ओंकारा अरुण पाटील या तरुणाच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ५ लाखांची मदत दिली आहे. बेळगाव जिल्ह्यातील पुराचे निरीक्षण करून परतत असताना मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर मृत ओंकारच्या आईकडे ५ लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व महिला व …

Read More »

विजेच्या धक्क्याने सुळेभावीत दोन महिलांचा मृत्यू

  बेळगाव : श्रावण सोमवारी एका मंदिरात साफसफाई करताना दोन महिलांना विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे घडली आहे. सुळेभावी गावातील वाल्मिकी मंदिराची साफसफाई सुरू असताना ही घटना घडली. मंदिराची साफसफाई आणि मंडप लावताना कलावती बिदरवाडी (३७) आणि सविता ओंटी (३६) यांचा जागीच मृत्यू …

Read More »

१४ तास काम करण्यास आयटी कर्मचाऱ्यांचा विरोध

  सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने बंगळूर : राज्य आयटी/आयटीईएस कर्मचारी संघटनेने कर्नाटक शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स कायद्यात सुधारणा करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आणि दिवसाचे १४ तास काम करणार नाही, असे स्पष्ट केले. आयटी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्यासाठी कमर्शिअल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, १९६१ मध्ये सुधारणा करण्याची राज्य सरकारची योजना आहे, …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाहायला गेलेल्या तरुणाला बसला विजेचा धक्का

  बेळगाव : कागवाड तालुक्यातील जुगुळ गावात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला विजेचा धक्का बसल्याने गंभीर दुखापत झाली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या जुगुळ गावाच्या दौऱ्यावर असताना विजेचा धक्का लागून 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी छतावर चढलेल्या महेश या तरुणाला विजेचा धक्का बसला आणि त्याच्या चेहऱ्याला आणि हाताला गंभीर …

Read More »

अतिवृष्टीमुळे खानापूर, बेळगाव ग्रामीण व कित्तूर तालुक्यातील अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर

  खानापूर : बेळगाव जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे, बेळगाव ग्रामीण, खानापूर तालुका आणि कित्तूर तालुक्यांतील अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, यांनी एका आदेशान्वये दिली आहे. खानापूर तालुका, बेळगाव ग्रामीण आणि कित्तूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे बालकांना अंगणवाड्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यासाठी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, मंगळवार …

Read More »

गोकाकमधील पूरग्रस्त भागाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या समस्या

  बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित गोकाकमधील विविध भागांना भेट दिली आणि काळजी केंद्राची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत असलेल्या घटप्रभा नदीवरील जलमय झालेल्या लोळसूर पुलाची पाहणी केली. यावेळी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी नवीन पूल बांधण्याचे आवाहन केले. यानंतर त्यांनी लोळसूर पुलाजवळ आठवडाभरापासून बॅकवॉटरने तुंबलेल्या …

Read More »

गावे स्थलांतरीत करण्याच्या निर्णयासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी

  खानापूर : कस्तुरीरंगन अहवालानुसार केंद्र सरकारने खानापूर तालुक्यातील 61 गावे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून केंद्र सरकार सदर गावे स्थलांतरीत करण्याचा विचार करीत आहे. तसा मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यावर 60 दिवसात सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने …

Read More »

दैवज्ञ ब्राह्मण शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : “नाना शंकर शेठ सारखी अनेक रत्ने जन्माला येतात तेव्हा समाजाचा उद्धार होतो, अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे जीवन कार्य या तरुण पिढीला समजण्याची गरज आहे त्याकरिता “पृथ्वीपती” हे नानांचे चरित्र असलेले पुस्तक या पिढीच्या हाती देण्याची जबाबदारी पालकांची आहे” असे विचार प्रख्यात अभिनेते प्रसाद पंडित यांनी बोलताना व्यक्त केले. …

Read More »

बळ्ळारी नाल्याची सफाई करून काँक्रीटीकरण करावे; शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  बेळगाव : शेतकऱ्यांना वरदान ठरावा यासाठी निर्माण करण्यात आलेला बळ्ळारी नाला शेतकऱ्यांना शाप ठरत असून पावसाळ्यात या नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. बळ्ळारी नाल्याची लवकरात लवकर स्वच्छता करून काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेती सुधारणा युवक मंडळ वडगाव, बेळगाव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. …

Read More »

सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी समितीच्या वतीने आवाहन

  बेळगाव : सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त जन्मशताब्दी समितीच्या वतीने एक स्मरणिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या स्मरणिकेत कैलासवासी अर्जुनराव घोरपडे यांच्या संदर्भातील काही फोटो छापावयाचे आहेत. बेळगावमधील काही संस्था आणि व्यक्ती यांच्याकडे असे फोटो असतील तर ते कृपा करून नितीन आनंदाचे जिजामाता बँक, संजय गुरव …

Read More »