Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

होनगाजवळील मार्कंडेय नदीपात्रात कचऱ्याचे साम्राज्य

  बेळगाव : होनगाजवळील मार्कंडेय नदी परिसरात विविध देवी देवतांचे फोटो, निर्माल्य, वैद्यकीय कचरा, प्लास्टिक बाटल्या तसेच इतर कचरा व जादूटोणा करण्यासाठी वापरण्यात येणारे नारळ, लिंबू आदी वस्तू नदीपात्रात टाकल्यामुळे नदीपात्राला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे जवळच असलेल्या वाहन सर्व्हिसिंग सेंटरचे साबणमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे नदीचे पाणी दूषित बनत …

Read More »

महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना ‘मोठं पॅकेज’

  नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीने बहुमताचा आकडा गाठला असून इंडिया आघाडीनेही आपण सरकार स्थापन करणार नसल्याचे म्हटले आहे. तर, आपल्याकडे स्पष्ट बहुमत असल्याने आपणच सरकार स्थापन करणार आहोत, असे भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. त्यानुसार, आता भाजपच्यावतीने शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. 9 जून रोजी मोदी …

Read More »

मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्याभिषेक दिन सोहळा

  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी (ता.६) शिवसेनेतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पांडुरंग वडेर यांच्या पौरोहित्याखाली सुरेश कुरणे यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर मान्यवरांच्या यांच्या हस्ते शिवपुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे व विजयराजे …

Read More »

भेदभाव न करता विकास कामे राबवणार : खासदार प्रियांका जारकीहोळी

  शरद पवार राष्ट्रवादी गटातर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : आपल्या विजयामध्ये निपाणी मतदारसंघातील नेते मंडळी कार्यकर्ते व मतदारांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सहकारत्न उत्तम पाटील यांनी आपल्या बहिणीला निवडून दिले आहे. याची जाणीव ठेवून काँग्रेससह राष्ट्रवादी पक्षाची कामे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. लवकरच निपाणी आणि चिकोडी येथे कार्यालय सुरू करून सर्वांच्या …

Read More »

बी. नागेंद्र मंत्रिपदाचा राजीनामा देणार

  बेंगळुरू : वाल्मिकी विकास महामंडळातील मोठ्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बी. नागेंद्र यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असून ते आज सायंकाळी 7.30 वाजता मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्य काँग्रेस सरकारने वाल्मिकी महामंडळात 87 कोटी रुपयांची लूट केली. या घोटाळ्यात मंत्री बी. नागेंद्र यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी यापूर्वीच केला होता …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : बेळगाव येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन गुरुवार दिनांक ६ जून रोजी छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाचे प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत …

Read More »

गाझातील शाळेवर बॉम्बहल्ला; 30 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश

  गाझा शहरात इस्राइलचा नरसंहार अद्याप सुरूच आहे. जगभरातून टीका होत असूनही, नेतन्याहू आणि त्यांच्या सैन्याने गाझा आणि रफाहवर त्यांचे हल्ले सुरूच ठेवले आहेत. यावेळी इस्रायली लष्कराने मध्य गाझा पट्टीतील नुसरत कॅम्पमध्ये राहणाऱ्या निरपराध लोकांना लक्ष्य करत हवाई हल्ले केले. शाळेवर झालेल्या हल्ल्यात किमान 30 पॅलेस्टिनी नागरीक ठार झाले आहेत. …

Read More »

उत्तराखंडमध्ये 22 ट्रेकर्स खराब वातावरणात अडकले, 9 जणांचा मृत्यू

  डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या 22 जणांसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. अचानकपणे खराब वातावरणात रस्ता चुकल्यामुळे 9 ट्रेकर्सचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १३ ट्रेकर्सचा शोध चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत ट्रेकर्समध्ये पुण्यातील एका तरुणाचा समावेश आहे. तर उर्वरित ट्रेकर्स हे कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील आहेत. उर्वरित ट्रेकर्सचा …

Read More »

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विजयाने ‘श्रीगणेशा’, आयर्लंडचा 8 गड्यांनी पराभव

  न्यूयॉर्क : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचा भारताने विजयी प्रारंभ केला. बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा 8 गडी राखून आणि 48 चेेंडू शिल्लक ठेवून मोठा विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाज चमकले. अर्शदीप सिंगने आयर्लंडला सुरुवातीला धक्के दिले. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांनी तिखट मारा करून आयर्लंडच्या फलंदाजांना दडपणाखाली आणले. …

Read More »

लाख मोलाची मते हजारांवर…

  (१) कालच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता समिती उमेदवाराला पडलेली मते ही चिंताजनक आहेत. आजपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीने अनेक निवडणुका लढविल्या पण यावेळी समिती उमेदवाराला पडलेली मते पाहता चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुका लढवते तो लढ्याचा एक भाग म्हणून. समितीच्या राजकारणाला एक वैभवशाली इतिहास आहे. एक काळ असा …

Read More »