Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

कर्ज फेडण्यास विलंब झाल्याने पत्नी- मुलाला ठेवले नजरकैदेत; कंटाळलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

  हुक्केरी : कर्जफेडीला दिरंगाई केल्याने महिलेने शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलाला आपल्या घरात नजरकैदेत ठेवल्याने एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी येथील इस्लामपूर येथे घडली. राजू खोतगी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, गावातील सिद्धव्वा बायन्नावर नावाच्या महिलेकडे मयत राजू यांनी ५ …

Read More »

तलावातील गाळ काढण्याचा केवळ फार्स

  माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद ; माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : स्थानिक आमदार खासदारांची निपाणी नगरपालिका, राज्य आणि केंद्रात सत्ता होती. या काळात जवाहर तलावातील गाळ काढता आला नाही. नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी गाळ काढण्याचा केवळ फोर्स केला. त्यांच्या नियोजन अभावी आता शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप …

Read More »

हेस्कॉमचा झटका, कोगनोळीत उपकरणे जळाली

  कोगनोळी : अचानक उच्च दाबाने विद्युत पुरवठा झाल्यामुळे विद्युत उपकरणे जळाल्याची घटना घडली असून यामध्ये नागरिकांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली. शुक्रवारचा आठवडी बाजार होता. ७ वाजण्याच्या दरम्यान उच्च दाबाने विद्युत पुरवठा झाला. त्यामुळे दुप्पट प्रकाश पडला. अचानक काही घरातील, दुकानातील …

Read More »

खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार

  पणजी : राज्यात रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसावेळी भरसमुद्रात २४ पर्यटक असलेली बोट अडकली. बोटीवर पर्यटकांसह दोन कर्मचारी असा २६ जणांचा गट होता. याबाबत माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी धाव घेत त्यांचे जीव वाचवले. मुरगाव बंदरनजीक दोनतास हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ चालले होते. पणजीहून रविवारी सायंकाळी ‘नेरुल पॅराडाईज’ या …

Read More »

पाचव्या टप्प्यात ५९ टक्क्यांहून अधिक मतदान; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात ५९.०६ टक्के मतदान झाले. या टप्प्यात ४९ मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात आले. पश्चिम बंगालमधील तुरळक हिंसाचार आणि ओदिशातील मतदान यंत्रातील कथित बिघाड-गोंधळ वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. महाराष्ट्रात सुमारे ६० टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वाधिक ७३.१४ …

Read More »

कृष्णा नदीच्या पाणी पातळीची मंत्री सतीश जारकीहोळींनी केली पाहणी

  चिक्कोडी : कुडची शहराजवळील कृष्णा नदी पात्रातील पाणी पातळीची मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्थानिक नेते आणि विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र सरकारने कोयना जलाशयातून कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना पात्र पाठवले होते. या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने कृष्णा …

Read More »

कपिलेश्वर तलाव परिसरातील समस्यांकडे महापालिका व हॅस्कॉमचे दुर्लक्ष

  बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरच्या पाठीमागे असलेल्या कपिलेश्वर तलाव परिसरातील समस्यांकडे महानगरपालिकेचे तसेच हॅस्कॉमचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कपिलेश्वर तलावात परिसरातील लहान मुले तसेच तरुण वर्ग नेहमीच पोहण्याचा आनंद लुटत असतात. सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे बालचमू कपिलेश्वर तलावात पोहण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. मात्र या …

Read More »

जवाहर तलाव परिसर स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष का?

  सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार; माजी सभापती प्रा. राजन चिकोडे निपाणी (वार्ता) : शहर व उपनगरातील नागरिकांना येथील जवाहर जलाशयातून केला जातो. पण पावसाळ्यातील पाणी येण्याचा मार्गावरील झाडे झुडपे व कचऱ्याची स्वच्छता गेल्या पाच वर्षापासून सचिन लोकरे आणि सामाजिक कार्यकर्त्यातर्फे केली जात आहे. या उपक्रमाचे कौतुक होत असून स्वच्छतेकडे नगरपालिका प्रशासनाचे …

Read More »

गुजरात एटीएसची मोठी कारवाई, आयएसआयएसच्या ४ दहशतवाद्यांना अटक

  अहमदाबाद : अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी 2023 मध्ये एटीएसने राजकोटमधून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. ते तिन्ही दहशतवादी बांगलादेशी हँडलकरसाठी काम करत होते. दहशतवादी संघटनेसाठी लोकांची भरती …

Read More »

सदाशिवनगर स्मशानभूमी अव्यवस्थेचे आगार

  बेळगाव : बेळगावमधील सदाशिवनगर स्मशानभूमी हि अव्यवस्थेचे आगार बनली असून अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सदाशिवगर स्मशानभूमीत सुधारणा करण्यासंदर्भात वृत्त प्रकाशित होत आहे. मात्र केवळ आश्वासने देऊन अद्याप स्मशानभूमीच्या सुधारणेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या स्मशानभूमीत शेडची सोय करण्यासाठी अनेक महिन्यांपासून …

Read More »