युवा नेते श्रीनिवास पाटील : शेडबाळला पंचकल्याण महोत्सवात सहभाग
अथणी : अहिंंसा परमोधर्म यासह जैन धर्मातील तत्वज्ञान मानवी आयुष्याला दिशा देणारे आहे, असे मत भाजपचे युवा नेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले.
शेडबाळ येथे श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्यावतीने आयोजित केलेल्या पंचकल्याण महोत्सवात श्रीनिवास पाटील सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले, जैन धर्माचे सिद्धांत, तत्वज्ञान विश्वव्यापी आहे. शांतीचा व अहिंसेचा संदेश देणारे हे तत्वज्ञान मानवी उद्धारासाठी अत्यंत मोलाचे आहे. या तत्वांचा अवलंब करत वाटचाल झाल्यास मानवकल्याणासाठी हे पूरक ठरेल.
यावेळी पाटील यांनी तिर्थंकरांची पूजा करून मुनी महाराजांचा आशिर्वाद घेतला. पंचकल्याण महोत्सव समितीतर्फे पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शेडबाळ येथील ज्येष्ठ मंडळी, जैन समाजाचे अनेक मुनी महाराज, पंचकल्याण समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच श्रावक, श्राविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक
Spread the love बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …