Thursday , March 5 2026
Breaking News

…तर पालिकेसमोर कचरा टाकू : नगरसेविका वाणी जोशी यांचा इशारा

Spread the love

 

बेळगाव : कुंदानगरी बेळगावात कचरा विल्हेवाटीची समस्या मोठी डोकेदुखी बनली आहे. खुद्द नगरसेवकांनीच मनपाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे.होय, महापालिकेच्या प्रभागातील कचरा उचलण्यास होत असलेल्या दिरंगाईबाबत नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत. दर चार दिवसांनी घरोघरी कचरा नेणे टाळावे आणि तो दररोज किंवा दुसऱ्या दिवशी उचलावा, अशी नगरसेवकांची मागणी आहे. पण तरीही तसे होताना दिसत नाही. या सर्व परिस्थितीत रस्त्याच्या कडेला पडलेले कचऱ्याचे ढीग 20 दिवसांपासूनही उचललेले नाहीत. त्यामुळे बहुतांश नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे. हीच समस्या प्रभाग क्रमांक 43 मध्ये तीव्र बनल्याने तेथील नगरसेविका वाणी जोशी यांनी महापालिकेला कडक शब्दांत पत्र लिहीले आहे. चिदंबरनगरसह त्या प्रभागात जमणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास तो उचलून आरपीडी क्रॉस येथील मनपा कार्यालयासमोर टाकू, असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनीही मनपाच्या अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत अनेकदा सूचना दिल्या आहेत. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आ. अभय पाटील यांनी कचरा पालिका आयुक्तांच्या घरासमोर टाकला होता. आता नगरसेवकांनीही तोच मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रकाराबाबत महापालिकेचे अधिकारी आता तरी जागे होणार का, हे पहावे लागेल.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *