Monday , December 8 2025
Breaking News

विजेच्या धक्क्याने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : खानापूर रोड, मच्छे येथील नेहरू नगर परिसरात असलेल्या श्रीनिवास फॅक्टरीच्या शेजारी वास्तव्यास असणाऱ्या बोंगाळे कुटुंबातील बालिकेला हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे जीव गमवावा लागला. मधुरा केशव मोरे (वय १३) या बालिकेचा विजेच्या धक्क्याने सोमवारी मृत्यू झाला आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती अशी की, मूळ येळ्ळूर राजहंसगड येथे राहणारी आणि सध्या वडिलांच्या कामानिमित्त कोल्हापूर येथे स्थायिक असणारी मधुरा हि आपल्या आजोळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आली होती. खेळता खेळता मधुराचा हात हाय वोल्टेज केबलला लागला आणि पाहता क्षणीच ती उडून दुसऱ्या मजल्यावर पडली आणि जळून खाक झाली.
गेल्या २ वर्षांपासून सातत्याने हेस्कॉमकडे याबाबत तक्रार करूनही अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे आज एका मुलीला जीव गमावण्याची वेळ आली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. सुट्टीत आजोळी आलेल्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

नवहिंद सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी सायनेकर तर व्हा. चेअरमनपदी अनिल हुंदरे यांची निवड

Spread the love  येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *