बेळगाव : जन्म-मृत्यू नोंदणीचे काम मुदतीत पूर्ण करावे. नोंदणी प्रक्रियेत दिरंगाई झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय जन्म-मृत्यू समन्वय समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
जन्म-मृत्यू दाखले हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत आणि नोंदणीपूर्वी त्यांची माहिती नीट तपासली पाहिजे. नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या निबंधकांनी विहित मुदतीत नोंदणी करण्यासाठी पावले उचलावीत.
जन्म-मृत्यू नोंदणी हा वैयक्तिक फायद्यांसाठी आणि सामाजिक दर्जा सुरक्षित करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या संदर्भात सर्व नोंदणी करणाऱ्यांनी जन्म-मृत्यू नोंदणी कालमर्यादेत करावी. चूक झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.
जिल्ह्यातील जन्म-मृत्यू नोंदणी कालमर्यादेत नोंदवून प्रगती साधण्यासाठी तहसीलदारांनी दर महिन्याला बैठक घेऊन बैठकीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा. व बैठकीत चर्चा झालेल्या विषयांवर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व संबंधित पक्षांशी नियमित समन्वय साधून नोंदणीची कामे मुदतीत नोंदविण्याची कार्यवाही करण्याचे ही त्यांनी सांगितले.