Thursday , March 5 2026
Breaking News

हिवाळी अधिवेशन कोणत्या नैतिक अधिकाराने भरविणार : राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांचा सवाल

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव हिवाळी अधिवेशन घेण्याच्या तयारीत असलेल्या सरकारची कोणती नैतिकता आहे. मुडा प्रकरणात सीएम सिद्धरामय्या आणि त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाला आहे, यावरून जनता सवाल उपस्थित करत आहे.. त्यांना कोणत्या तोंडाने उत्तर देणार? असा सवाल राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी उपस्थित केला.

शनिवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कुटुंबावर मुडा घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिकी घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. याबद्दल लोक सरकारला प्रश्न विचारत आहेत. सरकार काय उत्तर देणार असा सवाल त्यांनी केला. मंत्री प्रियांक खर्गे यांनी सिद्धांत विहार ट्रस्टची जमीन परत केली आहे. यावर सरकारची प्रतिक्रिया काय? अधिवेशन आयोजित करण्याची सरकारची नैतिकता आहे का, असा सवाल त्यांनी केला.हुबळी दंगल प्रकरण मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात जनक्षोभ व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा आणि मुडा प्रकरणाच्या नैतिकतेवर चौकशीला सामोरे जावे, अशी मागणी त्यांनी केली. शहरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामकाजाची चौकशी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप नेते एम. बी. जीरली बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणायचे की मुडा प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *