
बिजगर्णी….. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.महाविदयालयीन काळात अधिकाधिक छंद जोपासला जावा. अशा श्रमसंस्कार शिबिरातून व्यक्तीमत्व घडत जाते. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन कला सादरीकरण करण्यासाठी संधी मिळते.आमच्या बिजगर्णी गावात हे शिबिर आयोजित केल्याबद्दल धन्यवाद देतो. कोणतीही इथे कमतरता भासणार नाही सर्वतोपरी सहकार्य करुन सहा दिवस यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे आवाहन त्यांनी केले.
नरसिंगराव पाटील महाविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचा उद्घाटन सोहळा श्री ब्रह्मलिंग मंदिराच्या आवारात उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीनी सुमधुर आवाजात स्वागत गीत सादर केले.
अध्यक्षस्थानी सौ. रेखा नाईक होत्या.
निखिल राजेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. संत गाडगेबाबा, छ.शिवाजी महाराज, जिजाऊ माता, श्री सरस्वती, देवी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.
व्यासपीठावर रेखा नाईक, निखिल राजेश पाटील, महादेव मंगेश पाटील, वसंत अष्टेकर, यल्लापा बेळगावकर, श्रीरंग भास्कर, मनोहर बेळगावकर, एस .जी पाटील, ऍड. नामदेव मोरे, वाय. पी. नाईक, आप्पा जाधव, महेश पाटील, संतोष कांबळे, सौ. चंद्रभागा जाधव, के आर भास्कर, गायत्री सुतार, शीतल तारीहाळकर, श्री. रविकांत, ए.बि, मगदूम, किशोर केळकर आदी मान्यवर उपस्थित होते
प्रास्ताविक सौ. शीतल देसाई यांनी, आभार टी व्ही सावंत, सूत्रसंचालन प्रा. बी जी कलगुटकर, कार्यक्रम अधिकारी प्रा पी व्ही नाकाडी होते.
यावेळी वाय पी नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना अशा शिबिरातून राष्ट्रीय एकात्मता दृढहोते देशप्रेम, सामाजिक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रेरणा मिळते स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, पर्यावरण संरक्षण, विविध संस्कृती जवळून अनुभवता येते. संताचे विचार, शिकवण अंगिकारले जाते. थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या किर्तनतून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तुकडोजी महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी स्वच्छता व चारित्र्य याची शिकवण दिली. माणसात देव शोधणारा हा संत होता एका हातात झाडू घेऊन, तर हातात मडके घेऊन गावातून प्रबोधन केले. देव दगडात नसून माणसात आहे, सर्व सामान्यांना कळेल अशा भाषेत सांगायचे.
विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित उद्घाटन कार्यक्रमात नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी निवृत्त प्राध्यापक ए. बी. मगदूम यांनी या शिबिराचा उद्देश, भविष्यात उपयुक्त ठरेल. मिळणारा अनुभव श्रम करण्याची सवय राष्ट्रीय स्तरावर योगदान दिले जाणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून हा शैक्षणिक उपक्रम तुमच्यासाठी दिशा देणारा आहे, असे मौलिक विचार व्यक्त केले.
यावेळी ऍड. नामदेव मोरे, किशोर केळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

Belgaum Varta Belgaum Varta