बेळगाव (प्रतिनिधी) : कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून मंगळवार पेठ टिळकवाडी येथील एका महिलेचा खून करण्यात आला आहे.गीता रणजीत दावले गवळी (वय 55) असे मयत महिलेचे नाव आहे.
मयत गीता हीचा दीर गणेश गवळी याने आज सकाळी आठच्या दरम्यान गीता यांच्यावर चाकूचे सपासप वार करून त्यांची हत्या केली. या प्रकरणामुळे टिळकवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गणेश गवळी याला टिळकवाडी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पुढील अधिक तपास सुरू आहे. मयत गीता यांचा मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta