Thursday , September 19 2024
Breaking News

कर्नाटक

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट

  शिरूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज उत्तर कन्नड जिल्ह्यातील विविध भागात पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. मुख्यमंत्री रविवारी सुट्टीच्या दिवशीही विश्रांती न घेता जिल्हा दौऱ्यावर गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, त्यांनी कारवार जिल्ह्यातील शिरुर येथील दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच …

Read More »

खानापूर तालुक्यात पावसाची संततधार सुरूच; चापगाव येथे अनेक घरांची पडझड

  खानापूर : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस रविवारीही कायम होता. कणकुंबी, जांबोटी, भीमगड, लोंढा, नागरगाळी वनपरिक्षेत्रात नेहमीप्रमाणे पाऊस सुरू असून संततधार पावसामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. भीमगड अभयारण्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे भांडुरी  भरला आहे. त्यामुळे देगाव-हेमाडगा आणि पाली-मेंडील गावांमधील रस्ता आणि पुलावरून अनेक फूट पाणी वाहत आहे. …

Read More »

बेळगाव, खानापूर तालुक्यातील शाळा, कॉलेजला 22 व 23 रोजी सुट्टी

  बेळगाव : बेळगाव, खानापूर परिसरात सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 34 (एम) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत, सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या आणि पदवीधरपूर्व (12 वी पर्यंत) बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यात खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार दिनांक 22 व मंगळवार …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी केला खानापूर तालुक्यातील विविध भागांचा पाहणी दौरा

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. खानापूर तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन सद्यस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि नदी-नाल्यांची पाणी पातळी तपासली. तालुक्यातील कुसमळी गावातील पुलाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी …

Read More »

‘आयटी कर्मचाऱ्यांनी १४ तास काम करावे’, कर्नाटकच्या प्रस्तावावर कामगार संघटनाची नाराजी

  बंगळुरू : कर्नाटक हे आयटी कंपन्यांचे हब मानले जाते. बंगळुरूमध्ये अनेक आयटी कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. जगभरातील आयटी प्रोफेशनल याठिकाणी काम करतात. आता कर्नाटकमधील आयटी कंपन्यांचा एक निर्णय वादात अडकला आहे. येथील आयटी कंपन्यांनी कर्नाटक सरकारला कर्मचाऱ्यांचा कामाचा दिवस १४ तासांचा करण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावाचा आता कामगार …

Read More »

कर्नाटकातील काही जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जाहीर

  बंगळुरू : कर्नाटक राज्यात पावसाचा जोर कायम आहे. घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे डोंगराळ भागात परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पाऊस सतत पडत असून 21 आणि 22 जुलै रोजी हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. किनारपट्टी आणि पर्वतीय भागात …

Read More »

खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण

  खानापूर : प्रति वर्षाप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच इतर इयत्तेतील गरजू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाते त्यानुसार खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील विविध गावातील शाळांमध्ये एकत्र शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. खानापूरमधील शिरोली केंद्रावर हा वितरणाचा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख …

Read More »

नियती फाउंडेशनतर्फे डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर

  खानापूर : नियती फाउंडेशन आणि श्री गुरुदेव फाउंडेशन यांच्यावतीने आज शनिवार दिनांक 20 जुलै रोजी डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर नियती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी बसवराज हापळी, ऍड. रुद्रगौडा पाटील व नियती को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्मचारी उपस्थित होते. या शिबीराचा …

Read More »

शोकांतिका! एका महिलेला उपचारासाठी चक्क तिरडीवरून आणले!

  खानापूर : एकीकडे देश तंत्रज्ञानात विकसित होत चंद्रावर पोचला असला तरी गावे मूलभूत सुविधांपासून अद्याप वंचित आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे लोटली तरी देखील ग्रामीण भागातील अनेक गावे शासनाच्या सोयीसुविधांपासून वंचित आहेत. याचा प्रत्यय नुकताच खानापूर तालुक्यातील आमगाव गावात आला असून गावातील एका महिलेला उपचारासाठी चक्क तिरडीवरून 4 …

Read More »

जांबोटी – चोर्ला मार्गावर वाहतूक कोंडी; वाहतूक मार्गात बदल

  खानापूर : पश्चिम घाटात सतत पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही पावसाचा जोर कायम आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूल जीर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक मार्ग बदलण्यात आला आहे. बेळगाव शहरातून जांबोटी- चोर्ला मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांनी पिरनवाडी क्रॉसजवळ डावीकडून वळण घेऊन …

Read More »