Thursday , September 19 2024
Breaking News

कर्नाटक

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; 8 हून अधिक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर

  बंगळुरू : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून पुढील 6 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 6 दिवस 8 हून अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, कोडागु, चिक्कमंगळूरू, चामराजनगर, हसन, मंड्या, म्हैसूर जिल्ह्यांत …

Read More »

खानापूर फिश मार्केटमध्ये 80 किलोचा मासा

  खानापूर : खानापूर फिश मार्केटमध्ये खवय्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कारण नेहमीप्रमाणे जून महिन्यापासून समुद्रामध्ये मासेमारीला बंदी घातली जाणार आहे. त्यानंतर समुद्राचे ताजे मासे खाण्यासाठी मिळणार नाहीत. म्हणून खवय्यांची गर्दी वाढत असून प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे मासे विक्रीस ठेवण्यात आले आहेत. फिश मार्केटमधील रोहित पोळ, यांच्या एम जी पी …

Read More »

खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट

  पुराचा सामना करण्यासाठी खबरदारी घ्या : सीईओ राहुल शिंदे खानापूर : यावर्षी मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने तालुक्यातील सर्व गावांमध्ये अतिवृष्टी व पुराचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिल्या. बुधवारी (मे-२२) त्यांनी तालुक्यातील लोंढा ग्रामपंचायतीतील अतिवृष्टी व पांढरी …

Read More »

खानापूर बस स्थानक फलकावर मराठीला स्थान द्यावे

  खानापूर : लवकरच उद्घाटन होणाऱ्या खानापूर येथील नूतन बस स्थानकावर मराठी फलकाना स्थान द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने देण्यात आला आहे. तसेच याबाबत बुधवारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. खानापूर येथे नवीन बस स्थानक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले …

Read More »

रयत संघटनेचे जिल्हा हेस्कॉमला निवेदन

  तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : शॉर्ट सर्किटने निपाणी भागातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामा केला होता. कर्नाटक राज्य रयत संघटनेने दोन वर्षापासून पाठपुरावा केला होता. पण आज तागायत नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यासाठी रयत संघटनेने हुबळी येथील हेस्कॉम अधिकाऱ्यांना भेटून …

Read More »

२१ वर्षानंतर भेटले वर्गमित्र विद्यार्थी

  यरनाळमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा :आठवणींने शिक्षकही गहिवरले निपाणी (वार्ता) : लहानपणीच्या मराठी शाळेतील आठवणी सगळे जण जपून ठेवतात तशाच आठवणी यरनाळ येथील विद्यार्थ्यांनी तब्बल २१ वर्षांनी आपल्या मित्र-मैत्रिणी शिक्षकांसोबत जाग्या केल्या. निमित्त होते मराठी शाळेतील २००२ २००३ सालातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे. तब्बल २१ वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी …

Read More »

उपासना गारवे यांना आदर्श नगरसेविका पुरस्कार जाहीर

  निपाणी (वार्ता) : येथील नगरसेविका उपासना गारवे यांना ‘आदर्श नगरसेविका’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांच्या सहभागाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या महाविद्यालयात कर्तव्यदक्ष भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षणाधिकारी, राजकीय नेते व माठाधिशांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार …

Read More »

उत्तरकार्याला रोपांचे वाटप करून पर्यावरणपूरक उपक्रम

  निपाणी (वार्ता) : उत्तरकार्याला रोपांचे वाटप करून पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले आणि शिक्षिका अपूर्वा चौगुले दांपत्याने उत्तर कार्याला १२५ रोपे वाटप करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे समाजाला नवा आदर्श मिळाला आहे. यरनाळ येथील कमल रामचंद्र वास्कर यांचे निधन झाले. निपाणी येथील विद्यामंदिर शाळेच्या शिक्षिका …

Read More »

कागलजवळील महामार्ग कधी सुरु होणार

  नागरिकांतून उपस्थित होतोय सवाल कोगनोळी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवर नेमण्यात आलेली विविध खात्याची स्थिर पथके लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर हटविण्यात आली. मात्र निवडणुक काळात बॅरिकेडस लावून हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. अद्यापही बंद असलेल्या आरटीओ चेक पोस्ट नाक्यामधूनच वाहने सुसाट वेगाने धावत …

Read More »

कर्ज फेडण्यास विलंब झाल्याने पत्नी- मुलाला ठेवले नजरकैदेत; कंटाळलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

  हुक्केरी : कर्जफेडीला दिरंगाई केल्याने महिलेने शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलाला आपल्या घरात नजरकैदेत ठेवल्याने एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी येथील इस्लामपूर येथे घडली. राजू खोतगी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, गावातील सिद्धव्वा बायन्नावर नावाच्या महिलेकडे मयत राजू यांनी ५ …

Read More »