Tuesday , December 9 2025
Breaking News

कर्नाटक

निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीची आज महत्त्वाची बैठक

  निपाणी : म. ए. समिती निपाणी व म.ए. युवा समिती निपाणी यांचे वतीने सीमाप्रश्नासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी रविवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक मराठा मंडळ निपाणी येथे बोलविण्यात आलेली आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, नेमलेल्या उच्चाधिकार समिती सदस्यांची भेट व पुढील कार्यवाही या संदर्भात …

Read More »

म. मं. ताराराणी कॉलेज खानापूर येथे पालक चिंतन सभा संपन्न!

  खानापूर : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे दिनांक 4 जुलै 2025 रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक चिंतन सभा संपन्न झाली. बदलत्या काळानुसार इयत्ता बारावी वार्षिक परीक्षेचे बदललेले स्वरूप समजावून घेण्यासाठी शिवाय बोर्ड परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी सदर चिंतन सभेचे आयोजन करण्यात आले होते. एकंदरीत विद्यार्थीनीनी …

Read More »

सरकारी शाळेतील मुलांसाठी मोफत बस प्रवास

  डी.के. शिवकुमार; केजी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याना लाभ बंगळूर : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सरकारी शाळेतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील सरकारी शाळांमधील मुलांना शाळांमध्ये जाण्यासाठी मोफत बस सुविधा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करत घोषणा …

Read More »

भाजपविरुद्ध जाहिरात: मुख्यमंत्री सिद्धरामय्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याला स्थगिती

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध भाजपने लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या दैनिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. सिद्धरामय्या यांनी त्यांच्याविरुद्धचा मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी …

Read More »

गवाळी गावचे एकत्रितपणे स्थलांतर करा : ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणारे गवाळी हे जेमतेम हजार लोकसंख्या असलेले गाव. खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव मूलभूत नागरिक सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित आहे. जवळपास 200 कुटुंब असणारे गवाळी हे गाव सर्व मूलभूत सोयी सुविधा पुरवून एकाच ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी …

Read More »

सरकारने शिक्षकांची तातडीने नेमणूक करण्यास प्राधान्य द्यावे : रणजीत पाटील

  खानापूर : ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. मात्र शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शिक्षकांची तातडीने नेमणूक करण्यास प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून खानापूर …

Read More »

सूर्या सॉ मिल मालकाचा मृतदेह मलप्रभा नदीत सापडला!

  खानापूर : खानापूर येथील मारवाडी समाजातील प्रतिष्ठित नागरिक सूर्या सॉ मिलचे दयालाल कर्षन पटेल (वय 65) यांचा मृतदेह कुप्पटगिरी नजीक मलप्रभा नदीपात्रात बांबूच्या झुडूपात अडकलेला आढळला. दयालाल कर्षन पटेल हे मंगळवार दिनांक 8 जुलैपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला होता. मंगळवारी सायंकाळी मलप्रभा नदीच्या घाटावर त्यांचे चप्पल …

Read More »

गोवा येथील अपघातात खानापूरच्या तरुणाचा मृत्यू

  खानापूर : गोव्यातील फोंडा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार झाले तर दोघे जखमी झाले. मृतांपैकी एक खानापूर तालुक्यातील तरुण आहे. गुरुवारी दुपारी फोंडा येथील बेतोडा परिसरात एक भीषण अपघात घडला. या घटनेत खानापूर तालुक्यातील लोंढा पिंपळे येथील आदित्य देसाई (२२) हा तरुण जागीच ठार झाला. …

Read More »

फेमा प्रकरणात कर्नाटकातील काँग्रेस आमदारावर ईडीचे छापे

  बंगळूर : परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत प्रकरणांच्या संदर्भात कर्नाटकातील काँग्रेस आमदार एस. एन. सुब्बारेड्डी यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अचानक छापे टाकले. सूत्रांनी सांगितले की, बंगळुरमधील किमान पाच परिसरांची झडती घेण्यात येत आहे, ज्यामध्ये चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील बागेपल्ली येथील काँग्रेस आमदार सुब्बारेड्डी यांच्या घरांचाही समावेश आहे. सूत्रांनी …

Read More »

पाच वर्षे राज्याचा मीच मुख्यमंत्री; सिद्धरामय्या यांनी केला पुनरूच्चार

  बंगळूर : राज्यात मुख्यमंत्रीपद रिक्त नाही. त्यामुळे सत्तेच्या वाटपाचा मुद्दा हायकमांडसमोर उपस्थित झालेला नाही. मी ५ वर्षे मुख्यमंत्री म्हणून सत्तेत राहणार, असा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नवी दिल्लीत गुरुवारी बोलताना पुनरूच्चार केला. कर्नाटक राज्याच्या राजकारणातील नेतृत्व बदलाबाबत काही आमदारांच्या विविध व्याख्या आणि जाहीर विधानांमध्ये, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व अटकळांना खोडून …

Read More »