Wednesday , December 10 2025
Breaking News

खानापूर

संतसमाज कुप्पटगिरीतर्फे श्रीगणेश चतुर्थी प्रीत्यर्थ विशेष संत समागम संपन्न

  खानापूर : आध्यात्मिक धर्मगुरु, पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्रीक्षेत्र तपोभूमी – गोवा संचालित संत समाज – कुपटगिरी आयोजित श्रीगणेश चतुर्थी प्रीत्यर्थ विशेष संत समागमाचे आयोजन कल्लाप्पा पाटील यांच्या गृहस्थाश्रमी सोमनाथ पाटील यांच्या यजमान पदाखाली सुसंपन्न झाले. मंगलमूर्ती श्री गणरायाचं आगमन आपापल्या गृहस्थाश्रमामध्ये …

Read More »

खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षकांना यंदाचा जिल्हा आदर्श पुरस्कार जाहीर

  खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही पाच सप्टेंबर रोजी बेळगाव येथील कुमार गंधर्व येथे होणाऱ्या शिक्षक दिन कार्यक्रमात खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांना यंदाचा जिल्हा आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या पुरस्काराचे मानकरी निडगल मराठी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ कुंभार, आंबोळी मराठी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार, शिरोली मराठी शाळेचे …

Read More »

खानापूर सिव्हिल हॉस्पिटल समोरील वाहने अन्यत्र लावावीत

  खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर येथे सिव्हिल हॉस्पिटल समोर छोटाहत्ती रिक्षा लावतात. हॉस्पिटलला जाताना रुग्णांना अडचण होते. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी छोटाहत्ती रिक्षा लावतात ते बाजूला करून लावण्याची व्यवस्था करावी आणि दोन दिवसापूर्वी छोटाहत्ती KA22D2817 हा रिक्षावाला हॉस्पिटलला आलेल्या कार चालकाला दादागिरीची भाषा बोलत होता. इथं आमचे रिक्षा स्टॅन्ड आणि …

Read More »

मेरड्यात कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

खानापूर (प्रतिनिधी) : मेरडा (ता. खानापूर) येथील जनसेवक क्रीडा संघाच्या वतीने आयोजित पुरूष महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक के. के. पाटील होते. तर व्यासपीठावर गोव्याचे डीएसपी सी. एल. पाटील, ग्राम पंचायत सदस्य पांडुरंग पाटील, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा …

Read More »

खानापूरात पोषण महासप्ताह कार्यक्रम संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील चिरमुरे गल्लीतील मराठी शाळेत बाल कल्याण खाते, ओराग्य खाते, शिक्षण खाते व कायदा सुव्यवस्था याच्या सयुक्त विद्यामाने पोषण महासप्ताह नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीडीपीओ राममुर्ती के. व्ही. होते. तर व्यासपीठावर दिवानी न्यायाधीश सूर्यनारायण, ऍडिशनल दिवानी न्यायाधीश विदेश हिरेमठ, एम. वाय. कदम सेक्रेटरी बार असोसिएशन …

Read More »

गर्लगुंजीसह तालुक्यात गौरीचे आगमन

  खानापूर (प्रतिनिधी) : गणेशोत्सवात गणेशमूर्तीचे आगमन झाल्यानंतर चाहुल लागते जेष्ठ गौरी आवाहनाचे आगमन शनिवारी दि. ३ रोजी गर्लगुंजीसह तालुक्यात अनेक खेडोपाडी उत्साहात साजरी झाली. शनिवारी दि. ३ रोजी ज्येष्ठ नक्षत्रावर आगमन झाले. यावेळी घरातील तुळसी पासुन पावला पावलानी डोक्यावर गौरीची आगमन होते. विहिरीपासून महिलांनी गौरी डोकीवरून घेऊन घरात प्रवेश …

Read More »

चापगाव फोंडेश्वर मंदिर परिसर होणार प्रकाशमय : उद्योजक मारुती पाटील यांची ग्वाही

खानापूर : चापगाव येथील श्री फोंडेश्वर मंदिरासमोर मोठा सव्वादोन लाख रुपये खर्चून हॅलोजन बल्ब बसवण्याची ग्वाही कौंदल गावचे सुपुत्र व पुणे येथे स्थायिक असलेले उद्योजक मारुती पाटील यांनी दिली. यावेळी ग्रामस्थांनी ज्येष्ठांच्या हस्ते त्यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. येत्या दोन महिन्यात काम पूर्णत्वाला नेईन, असे सत्कार प्रसंगी बोलताना …

Read More »

दहावी परीक्षेत ध्येय, चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच : आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील

खानापूर (प्रतिनिधी) : दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यातील व पहिली परीक्षा आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. यासाठी सतत अभ्यास करा, असे आवाहन खानापूर तालुका आम आदमी अध्यक्ष भैरू पाटील यांनी दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेल्या ओलमणी येथील राजश्री शाहु …

Read More »

हत्तरगुंजी, मुडेवाडी, फुलेवाडी (डुक्करवाडी) गावच्या समस्या राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी सोडवाव्यात, ग्रामस्थांची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव व पणजी राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या हत्तरगुंजी, मुडेवाडी व फुलेवाडी या तिन्ही गावांची झालेली समस्या राष्ट्रीय महामार्गावरून गावांमध्ये जाताना सर्व्हिस रोड, दुभाजक न सोडल्यामुळे या तिन्ही गावच्या लोकांना बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कारण खानापूरकडून हत्तरगुंजी गावामध्ये वळताना दुभाजक न सोडल्यामुळे त्या लोकांना गणेबैल …

Read More »

‘ऑपरेशन मदत’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाअंतर्गत वनशेतीचा प्रारंभ

खानापूर : खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या गोल्याळी गावातील सरकारी शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना घेऊन ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे वनशेतीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. हा प्रयोग ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, याद्वारे पर्यावरणीय समतोल राखला जाईल व सेंद्रिय शेतीचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असे राहुल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना …

Read More »