हरियाणा : हरियाणात शनिवारी निवडणुकीची धामधूम संपली आहे. मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या आकडेवारीने भाजपचे टेन्शन वाढले आहे. तर या एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर आम आदमी पक्षाला फटका बसल्याचे दिसत आहे. एका एक्झिट पोलच्या आकेडवारीत काँग्रेस ५० पार जाताना दिसत आहे. …
Read More »छत्तीसगडमध्ये तब्बल ३२ नक्षलवाद्यांचा खात्मा
नारायणपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर येथील जंगलात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत ३२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश आलं आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष म्हणजे सुरक्षा …
Read More »माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला ईडीने बजावला समन्स
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला गेला आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अझरुद्दीनचे नाव पुढे आले आहे. ईडीने अझरुद्दीनला पहिला समन्स पाठवला आहे. त्याला गुरुवारी ईडीसमोर हजर व्हायचं होते पण त्याने जाणे …
Read More »थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग; २५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू
नवी दिल्ली : थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीत २५ विद्यार्थी आणि शिक्षकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेने थायलंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनेक कुटुंबावर शोककळा पसरली आहे. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मंगळवारी शाळकरी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक बसने सहलीला निघाले होते. याच …
Read More »तिरुपती बालाजी लाडू प्रसाद प्रकरण; देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा : सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : तिरुपती बालाजी लाडू प्रसाद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहे. लाडू प्रसाद तपासाचा निकाल लागण्याआधीच माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे असं मत न्यायालयाने …
Read More »मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मृगया, डिस्को डान्सर, अग्निपथ, गुरु यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून विविध भूमिका करणाऱ्या मिथुन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या १७ व्या सोहळ्यात …
Read More »उभ्या असलेल्या डंपरमध्ये खासगी बस घुसल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू
मैहर : मध्य प्रदेशातील मैहरमध्ये शनिवारी रात्री उशिरा प्रवासी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हायवा डंपरला धडकली. या अपघातात 2 वर्षाच्या मुलासह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात 24 जण जखमी झाले. त्यांना मैहर, अमरपाटन आणि सतना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या …
Read More »प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीचा खुलासा!
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या (तिरुपती मंदिर) लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा अंश असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने सुद्धा भेसळ झाल्याचे मान्य केले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमने आता सीएम नायडू यांच्यानंतर तिरुपती प्रसादमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याचे म्हटले आहे. टीटीडी कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव …
Read More »तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी प्रकरण : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडून मागवला अहवाल
नवी दिल्ली : तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशाच्या तेलाचा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे. आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी आज (20 सप्टेंबर) सांगितले की, मी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोललो आहे. मंदिराच्या प्रसादाची (लाडू) चाचणी होईल. वायएसआर …
Read More »तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर?; मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या प्रसादाबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गंभीर आरोप केला आहे. नायडू यांचे कट्टर विरोधक आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर व्हायचा, असा अतिशय धक्कादायक आरोप नायडू यांनी केला आहे. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये मोठा वाद निर्माण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta