सिक्कीम येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे १५०० ते २००० पर्यटक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील देखील अनेक पर्यटक अडकले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडकलेल्या पर्यटकांपैकी काही जणांशी फोनवरुन संवाद साधला. या सर्व अडकलेल्या पर्यटकांची विचारपूस करुन त्यांना मुख्यमंत्र्यांनी धीर दिला आहे. सिक्कीममधील …
Read More »गंगास्नान करायला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; १७ जणांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली
पाटणा : बिहारची राजधानी पाटणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगास्नान करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. १७ जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत बुडाली. ११ जणांचे प्राण वाचले. पण ६ जण बेपत्ता झाले आहे. स्थानिक नागरिक आणि रेस्क्यू टीमकडून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर …
Read More »एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं सूचक विधान
नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच एनडीए सरकार हे चुकून स्थापन झाले असून पुढील काळात हे सरकार कधीही कोसळू शकते, असे विधानही त्यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २४० जागांवर विजय मिळविला. बहुमताचा २७२ हा आकडा त्यांना …
Read More »पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
इटानगर : पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पेमा खांडू सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. तर चौना मीन यांनी शपथविधी सोहळ्यात अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याशिवाय बिऊराम वाघा, न्यातो दुकम, गानरील डेनवांग वांगसू, वांकी लोवांग, पासांग दोरजी सोना, मामा न्तुंग, दसांगलू पुल, …
Read More »चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; अभिनेते पवन कल्याण कॅबिनेट मंत्री
नुकत्याच झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीने बहुमत मिळवलं आहे. टीडीपीने ही निवडणुक प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते पवन कल्याण आणि भाजपाबरोबरच्या युतीत लढली होती. बहुमत मिळवल्यानंतर या तीन पक्षांच्या युतीने आज राज्यात सरकार स्थापन केलं असून चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नायडू …
Read More »कुवैतमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग, १० भारतीयांसह ४१ जणांचा होरपळून मृत्यू
कुवैतच्या मंगाफ शहरात बुधवारी (१२ जून) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका इमारतील आग लागून ४३ जणांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये १० भारतीय नागरिकांचा समावेश होता. स्थानिक माध्यमांनी मृतांच्या आकडेवारीची पुष्टी केली आहे. या भीषण आगीत ४० जण होरपळून निघाले असून त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं …
Read More »मोदींच्या मंत्रिमंडळात 20 नेते घराणेशाहीवाले; राहुल गांधींनी शेअर केली यादी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं मिळालं तर देशात इंडिया आघाडीलाही चांगलच यश लाभलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने 293 जागांवर विजय मिळवला असून इंडिया आघाडीला 234 जागांवर यश प्राप्त झाले. त्यामुळे, नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तर, काँग्रेसकडून राहुल गांधींचं नाव विरोधी …
Read More »जम्मू काश्मीरमधील भाविकांच्या बसवर हल्ल्यामागे विदेशी दहशतवाद्यांचा समावेश, दोघांचा फोटो जाहीर
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे भाविकांच्या बसवर गोळीबार करणारे दहशतवादी हे विदेशी असल्याचं स्पष्ट झालं असून अबू हमजा आणि अधुन अशी त्यांची नावं आहेत. या दोघांचं छायाचित्र सुरक्षा दलाने जाहीर केलं आहे. याआधी झालेल्या राजौरी आणि पुंछमधील दहशतवादी हल्ल्यांमागेही या दोन दहशतवाद्यांचा हात असल्याचं सांगितलं जातंय. या दहशतवादी हल्ल्यामध्ये …
Read More »मोदी मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर; शाह-गडकरींकडील जुनी खाती कायम, नड्डांकडे आरोग्य, तर शिवराज यांच्याकडे कृषी
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत देशाचा कारभार हाती घेतला आहे. दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर आज नव्या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक चालू झाली आहे. या बैठकीत खातेवाटपदेखील करण्यात आलं आहे. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जुन्या काही नेत्यांकडील खाती कायम ठेवण्यात आली आहेत. जसे की, अमित शाह यांच्याकडील गृह …
Read More »वैष्णोदेवीजवळ भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; १० ठार, ३३ जखमी
जम्मू : जम्मूच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी प्रवाशांनी भरलेल्या बसवर हल्ला केलाय. गोळीबारात बस चालकला गोळी लागल्याने बस दरीत कोसळली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ९ ते १० जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झालेत. उपजिल्हाधिकाऱ्यांनी १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. दहशतवाद्यांनी बसवर गोळ्या झाडल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta