Monday , December 8 2025
Breaking News

देश/विदेश

ट्रॅक्टर भरुन स्‍फोटके जप्‍त! १० नक्षली जेरबंद, मोठ्या हल्‍ल्‍याचा कट उधळला

  छत्तीसगड-तेलंगणा राज्‍यांच्‍या सीमेवर १० नक्षलवाद्यांना अटक करण्‍यात आली आहे. त्यांच्याकडून ट्रॅक्टरमध्ये भरलेली स्फोटके जप्त करण्यात आली असून, या वर्षातील मोठ्या हल्‍ल्‍याचा कट उधळण्‍यात पोलिसांना यश आले आहे. जेरबंद केलेल्‍या पाच नक्षली हे विजापूरचे रहिवासी आहेत. तेलंगणाच्या भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी सीमा भागात कारवाई केली आहे. या कारवाई संदर्भात तेलंगणा पोलिसांनी …

Read More »

आश्चर्यम्! झारखंडमध्ये एका महिलेने 5 मुलांना दिला जन्म

  रांची : आपण एखाद्या महिलेने जुळ्या किंवा तिळ्या मुलांना जन्म दिल्याचे ऐकले आहे. मात्र, एखाद्या महिलेने एकाच वेळी 5 मुलांना जन्म दिला अशी कल्पनाही केली नसेल. मात्र, हे वास्तवात घडले आहे. झारखंडच्या रांची येथे सोमवारी एका महिलेने चक्क 5 मुलांना जन्म दिला आहे. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात …

Read More »

साऊथचे प्रसिद्ध अभिनेते सरथ बाबू यांचे निधन

  तेलुगु दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांचे वयाच्या ७१ वया वर्षी निधन झालं. सरथ बाबू यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. दीर्घकाळ आजारी असल्यामुळे त्यांच्य़ावर हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होता. सरथ बाबू यांना रुग्णालयात दाखल करून एक महिन्यांहून अधिक काळ झाला होता. सोमवारच्या सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली …

Read More »

मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, संचारबंदी लागू; सैन्यही परतले

  मणिपूर : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये सोमवारी (दि. 22) पुन्हा हिंसाचार उसळला. यानंतर भारतीय लष्कर आणि सशस्त्र दलांना येथे परत बोलावण्यात आले आहे. राजधानीच्या न्यू चेकॉन भागात स्थानिक बाजारपेठेत जागेवरून मेईतेई आणि कुकी समुदायाच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यानंतर जाळपोळीच्या घटना घडल्या. तणावाची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ 144 …

Read More »

बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगचा नवा फंडा, बोटावर शाईऐवजी आता लेझर मार्क

  नवी दिल्ली : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे. तसेच ईव्हीएम मशीमध्ये एक कॅमेरा देखील असणार आहे. जो मतदान करताना मतदारांचे फोटो काढणार आहे. …

Read More »

कर्नाटक विजयानंतर काँग्रेसची बुधवारी रणनीतीसाठी बैठक

  नवी दिल्ली : कर्नाटकमधील घवघवीत यशानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्ष नेतृत्वाने भाजपविरोधात थेट लढती होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केद्रीत केले आहे.मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराममध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस या राज्यांतील निवडणुकांच्या रणनीतीबाबत विचार करत असून २४ मे रोजी संबंधित राज्यांतील …

Read More »

‘नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नाही तर राष्ट्रपतींनी करावं’, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी

  नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करण्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करणे चुकीचे असल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. तसेच या ‘नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करायला हवं, पंतप्रधानांनी नाही’ असं देखील राहुल गांधी म्हणाले …

Read More »

काँग्रेस आणि आपमधील तणाव नितीशकुमार करणार दूर? केजरीवालांची घेतली भेट

  नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली असून, त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त जदचे नेते नितीश कुमार यांनी आज (दि.२१) आप नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दरम्‍यान, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात फारसे सख्य नाही. या पार्श्वभूमीवर दोन …

Read More »

फुटबॉल सामन्यादरम्यान भीषण चेंगराचेंगरी, 9 जणांचा जागीच मृत्यू

  मध्य अमेरिकन देश एल साल्वाडोरमध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला. एल साल्वाडोरच्या राष्ट्रीय नागरी पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार प्रेक्षकांनी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, या गडबडीत काहीजण खाली पडले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला. …

Read More »

कर्नाटकात स्वच्छ, भ्रष्टाचार मुक्त सरकार देऊ : राहुल गांधी

  बंगळुरू : कर्नाटकात आम्ही तुम्हाला स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार देऊ, अशी ग्वाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत आम्ही तुम्हाला ५ वचने दिली होती. आम्ही खोटी आश्वासने देत नाही. कर्नाटक सरकारची पहिली कॅबिनेट बैठक होईल. त्या बैठकीत ५ आश्वासनांची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले. …

Read More »