Monday , December 8 2025
Breaking News

महाराष्ट्र

‘मुक्तायन’ काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर; नीलिमा फाटक, नवनाथ मुळवी, हिरामण सोनवणे ठरले सर्वोत्कृष्ट

  पुणे : शब्दरजनी साहित्य समूह, पुणे महाराष्ट्र आयोजित ‘मुक्तायन’ राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. विविध भागांतील कवींच्या सहभागातून निवड झालेल्या काही निवडक काव्य रचनांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट कवी म्हणून नीलिमा फाटक (निगडी, पुणे), नवनाथ रामकृष्ण मुळवी (फोंडा, गोवा) व हिरामण सोनवणे (धुळे) यांची निवड …

Read More »

‘अलमट्टी’च्या उंचीवरून कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचा कर्नाटकला इशारा

  कोल्हापूर : कर्नाटक सरकारचा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी अट्टाहास कायम आहे. या संदर्भात कायदेशीर हालचाली करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुद्धा इशारा दिला आहे. जर कर्नाटक सरकार वकील आणि जलतज्ज्ञांची फौज उभा करत असेल, तर आम्ही देखील त्या विरोधात तशीच वकिलांची …

Read More »

राज्याच्या प्रगतीत कोल्हापूर जिल्हा अग्रभागी राहण्यासाठी सर्वजण सज्ज होवूया : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासासाठी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा मंदिर परिसर विकास आराखडा, सर्किट बेंच, विमानतळ आदी सर्व विषय गतीने मार्गी लावण्यात येत आहेत. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया आणि राज्याच्या …

Read More »

पूर नियंत्रणासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे करावीत : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  मान्सूनपूर्व तयारीबाबत जिल्हा व तालुकास्तरावरील विभागांचा आढावा कोल्हापूर : येणाऱ्या पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, …

Read More »

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांची दुर्गराज रायगड येथे पाहणी….

  रायगड : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे येत्या ५ व ६ जून रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी नुकतीच दुर्गराज रायगडाला भेट दिली. या भेटीत गडावरील विविध सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली, तसेच स्थानिक विक्रेत्यांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी गडावरील …

Read More »

दुधगंगा काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधकाचे काम गतीने पूर्ण करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  दुधगंगा काळम्मावाडी धरणाची पालकमंत्र्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी कोल्हापूर : दुधगंगा काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधकाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु असून ते अधिक गती वाढवून पावसाळा सुरु होण्यापूर्वी जास्तीत जास्त पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. दुधगंगा काळम्मावाडी धरणाच्या पाहणी दौरा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा …

Read More »

राज-उद्धव एकत्र येणार?; ठाकरे बंधूंनी दिले सकारात्मक संकेत

  मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे यासाठी राज्यातील शिवसेनाप्रेमी मराठी नागरिकांनी केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर या दिशेने पहिले सकारात्मक संकेत दोन्ही ठाकरे बंधूनी दिले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ बाबी बाजूला ठेवून उध्दव ठाकरेंच्यासोबत जाण्याची तयारी राज ठाकरे यांनी दाखविल्यानंतर किरकोळ बाबींना …

Read More »

चांगभलंच्या गजरात रंगला जोतिबा यात्रेचा गुलाल; लाखो भाविकांची मांदियाळी

    कोल्हापूर : गुलाल खोबऱ्याची उधळण. जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर, गगनचुंबी सासनकाठ्यांचा ऐट, त्यांचा भार सांभाळून नाचवताना तहान भूक विसरणारे भाविक, महापूजा, अभिषेक, आरती, सायंकाळी पालखी सोहळा अशा पारंपारिक उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा आज, शनिवारी पार …

Read More »

श्री क्षेत्र जोतिबा यात्रा कालावधीत वाहतुक नियमन आदेश जारी

  कोल्हापूर (जिमाका) : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी), ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे दिनांक 10 ते 12 एप्रिल 2025 अखेर श्री क्षेत्र जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा संपन्न होत आहे. या कालावधीत महाराष्ट्रातून व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक आपआपल्या मोटार वाहनांनी जोतिबा डोंगरावर ये-जा करीत असतात. भाविकांची सुरक्षा …

Read More »

अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका!

  मुंबई : बदलापूरच्या अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. या प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. त्यावर पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश …

Read More »