Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

जिल्ह्यातील न्यायाधीशांच्या बदलीचा आदेश जारी

बेळगाव : दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर त्यात भर म्हणून आता विविध न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जारी करण्यात आलेल्या सदर आदेशानुसार बेळगाव द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पवनेश डी. यांची प्रथम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात बदली झाली आहे. तृतीय अतिरिक्त …

Read More »

कुप्पटगिरी पाणंद रस्ता होणे गरजेचे : प्रमोद कोचेरी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावाला जोडणारा पाणंद रस्ता हा सर्वे नंबर १५/८ हा सरकारी पाणंद रस्ता म्हणून नोंद आहे. तेव्हा पाणंद रस्ता होणे अतिमहत्वाचे आहे. यासाठी तहसीलदार प्रविण जैन यांनी या पाणंद रस्त्याचा नकाशा करून द्यावा. या पाणंद रस्त्यावर कोणी तरी जेसीबी लावून कामाला अडथळा आणण्याचे कामे केले …

Read More »

खानापूर रूमेवाडीजवळील साई काॅलनीत रस्त्याची दुरावस्था

खानापूर (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या सुरूवातीलाच खानापूर रूमेवाडीजवळील करंबळ ग्राम पंचायतीच्या हद्दीतील नविन वसाहतीतील साई काॅलनीत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याची दखल घेऊन खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याची पाहणी केली. यावेळी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा रस्त्यातुन शाळकरी लहान मुले तसेच वयोवृध्द नागरिकाना घरा …

Read More »

गोवावेस येथील ईएसआय क्लिनिकचे स्थलांतर; नोंद घेण्याचे आवाहन

बेळगाव : गोवावेस येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलाची इमारत धोकादायक बनल्याने तेथील ईएसआय क्लिनिक आता खाऊ कट्टा समोरील आदिशक्ती इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पुढील कांही वर्षे याच इमारतीत हे क्लिनिक सुरू राहणार असून ईएसआय संबंधित कामगारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव शहरात अशोकनगर येथे ईएसआयचे मुख्य …

Read More »

मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सर्वाधिक प्रगती करणारा देश : केंद्रीय मंत्री सोमप्रकाश

बेळगाव : गेल्या ८ वर्षांत केंद्र सरकारने गरिबांच्या कल्याणाचा हेतू ठेवून अनेक विकास योजना आणल्या आहेत. या काळात भारत जगातील सर्वाधिक वेगवान प्रगती करणारा देश ठरला आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सत्तेत ८ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त बेळगावातील …

Read More »

सीएम पुष्पहार तुम्हाला अन फेटा मला….!

संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं नेहमीच या- ना त्या कारणाने कायम चर्चेत राहिलेले दिसत आहेत. मंत्री उमेश कत्ती कोणत्या प्रसंगी काय बोलतील आणि काय करतील हे सांगता यायचे नाही. त्यामुळे प्रसार माध्यमांंत ते कायम चर्चेत राहिलेले दिसत आहेत. बेंगळूर येथे …

Read More »

म्हैसाळमधील 9 जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याकांड! दोघांनी जेवणातून विष घालून मारले

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. ही आत्महत्या सावकारी कर्जापोटीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता म्हैसाळमधील या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला …

Read More »

विद्यार्थ्यांनी अनुभवली मतदान प्रक्रिया

नूतन मराठी विद्यालयमध्ये उपक्रम : गुप्त पद्धतीने मतदान निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ  संचलित नूतन मराठी विद्यालय मध्ये सन 2022-23 मधील विध्यार्थी प्रतिनिधी पदासाठी गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची ओळख व्हावी, यासाठी प्रत्येक वर्षी निवडणूक प्रक्रिया घेतली जाते. यावेळी उमेदवारांनी एक दिवस …

Read More »

निपाणीत जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण!

दररोज लाखो लिटर पाणी वाया : शहरात कृत्रिम पाणी टंचाई निपाणी (वार्ता) : २४ तास पाणी योजनेच्या जलवाहिन्यांना निपाणीत फुटीचे ग्रहण लागले आहे. तर लिकीजेसचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून कंत्राट दिलेले कंत्राटदार …

Read More »

संकेश्वरात शुध्द पिण्याचे पाणी गटारीला..

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर कुंभार गल्लीतील जलवाहिनी फुटल्याने शुध्द पिण्याचे पाणी गटारीतून वाहताना दिसत आहे.पालिकेचे अधिकारी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी इकडे लक्ष द्यायला तयार नसल्याची तक्रार येथील येथील नागरिकांनी महिलांनी केली आहे. येथील लोकांनी जलवाहिनी दुरुस्तीची मागणी केलेली असली तरी कोणीही याची दखल घ्यायला तयार नसल्याने लोकांतून संताप व्यक्त केला …

Read More »