
खानापूर : ट्रेकसाठी गेलेल्या 9 विद्यार्थ्यांची गोवा आणि कर्नाटक वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 24 तासाच्या अथक परिश्रमानंतर विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली.
याबाबत मिळालेली माहिती की, गोवा-कर्नाटक सीमेवरील पारवाड गावाच्या हद्दीतील घनदाट जंगलातील जावनी धबधबा पाहण्यासाठी बेळगावमधील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील 9 विद्यार्थी शुक्रवारी दुपारी चार दुचाकींवरून गेले होते. पारवाड गावापासून 3 कि.मी. अंतरावर त्यानी आपल्या गाड्या लावून सर्व जण जंगलात गेले. जंगलाच्या पायवाटेने धबधब्याजवळ पार्टी करून सायंकाळी परतत असताना त्यांचा रस्ता चुकला. लागलीच ट्रेकर्सनी शुक्रवारी रात्री आपल्या कॉलेजच्या मित्रांना मदतीला येण्याचा संदेश पाठवला होता. ट्रेकर्सच्या मित्रांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर ए सी एफ. संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्री दहा वाजता पारवाड जंगलात कारवाईला सुरुवात केली. शिवाय, विद्यार्थी बेपत्ता झाल्याची बाब गोव्याच्या वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली, त्यामुळे त्यांनी गोव्याच्या जंगलातूनही ऑपरेशनला सुरुवात केली. शनिवारी पहाटे हे विद्यार्थी जावा गोव्याच्या जंगलात खडकांमध्ये दमून बसलेले आढळले, त्यांना कणकुंबी विभागीय वन अधिकारी कार्यालयात आणण्यात आले आणि प्राथमिक उपचारानंतर गोवा वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. गोवा वन विभागाने बेकायदेशीरपणे जंगलात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली सर्व 9 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ही बाब विद्यार्थ्यांचे पालक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यापर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांना गराडा घातल्याचे सूत्रांनी सांगितले.
या कारवाईत कणकुंबीचे आरएफओ शिवकुमार, भीमगड आरएफओ राकेश अर्जुनवाड, खानापूर आरएफओ नागराज बलेहोसूर, डीआरएफओ विनायक पाटील, गोवा डीएफओ आनंद यांच्यासह दोन्ही राज्यातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta